बेंगळूर /प्रतिनिधी
देशात कोरोनाचे मोठे संकट असताना एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मात्र दुसरीकडे परप्रांतीयांनी आपापल्या राज्यात स्थलांतर करण्यास जोर धरला होता. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यांनतर परप्रांतीय कामगारांचे मोठ्याप्रमाणात स्थलांतर झाले. बेंगळूर मधील बहुतांश स्थलांतरित कामगार बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड, ओडिशा आणि राजस्थानमधील होते. पण आता हे स्थलांतरित कामगार परत येताना पाहायलामिळत आहेत. पश्चिम बंगाल आणि बिहारमधील अनेक प्रवाशी गाड्यांच्या माध्यमातून बेंगळूरला पोहोचत आहेत. रेल्वे विभागाने दानापूर (बिहार), मुंबई आणि हावडा येथून रेल्वे आणि दिल्ली ते बेंगळूर या दोन गाड्या चालविल्या आहेत. नोकरीच्या शोधात परप्रांतीय कामगार शहरात परतत असल्याचे हे संकेत असू शकतात.