प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू होत असल्याने बेंगळूरकडे येणाऱयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्मयता आहे, असे सांगितले जात आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा म्हणाले, बेंगळूरला परत येणाऱया नागरिकांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे, असे त्यांनी सांगितले. बेंगळूर येथील कावेरी निवासमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे बेंगळूर शहरात येणाऱया नागरिकांची संख्या वाढणार असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्मयता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकाऱयांशी चर्चा करून कठोर नियम हाती घेण्याबाबत सूचना देणार आहे. याचबरोबर प्रत्येक जिल्हय़ांचा प्रवास हाती घेऊन कोरोनाचे व्यवस्थापन, विकास कार्याची पाहणी करणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील वास्तविक स्थिती समजण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.