बेंगळूर/प्रतिनिधी
मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे, बेंगळूरवळील लोकप्रिय पर्यटनस्थळ नंदी हिल्समध्ये भूस्खलन झाल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे म्हंटले आहे.
जिल्हा प्रशासनाने सांगितले की या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तसेच अधिकाऱ्यांनी सांगितले की भूस्खलनामुळे पर्यटक डोंगरावर जाऊ शकणार नाहीत.
नंदी टेकड्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे कारण टिपू सुलतानच्या काळात हिल स्टेशन असून पर्यटक उन्हाळ्यात या ठिकाणी भेट देत असत. दरम्यान आता भूस्खलन झाले असल्याने पर्यटकांना काही दिवस टेकड्यांवर जाता येणार नाही.