बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची अमलबजावणी करण्याचे सक्त आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात महापालिका आणि पोलीस प्रशासन कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत होते. दरम्यान, बेंगळूर शहरी जिल्ह्यात महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आजपर्यंत एकूण १२.५८ कोटी रुपये दंड म्हणून वसूल केला आहे, असे बेंगळूर पालिकेने दिली आहे.
दरम्यानच, बीबीएमपीच्या आकडेवारीनुसार, मे २०२० ते ७ ऑगस्ट २०२१ याकालावधीत दरम्यान दंड वसूल करण्यात आला होता. मास्क न घातल्याबद्दल ४.९३3 लाख लोकांकडून ११.८६ कोटी रुपये दंड वसूल केला आहे, तर शारीरिक अंतर राखण्यात अपयशी ठरलेल्यांकडून आणखी ७१.३५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.