बेंगळूर/प्रतिनिधी
वाढत्या सायबर क्राईमच्या घटना लक्षत घेता बेंगळूर शहर पोलीस लवकरच एक नवीन सायबर क्राईम घटनांविषयी अहवाल (सीआयआर) प्रणाली सुरू करणार आहे. यामध्ये मुख्यत्वे आर्थिक घोटाळ्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
बेंगळूर शहर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित लोक पोलिसांना कॉल केल्यावर तक्रार दाखल करू शकतात आणि पोलीस दोन तासांच्या सुवर्ण कालावधीत लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडे काम करतील.
बेंगळूर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी सांगितले की ही प्रणाली देशातील पहिली आणि नागरिकांना अनुकूल अशी प्रणाली आहे. जिथे पीडित व्यक्तींना सायबर क्राईमच्या घटनांपासून, विशेषकरुन आर्थिक फसवणूकीपासून त्वरित दिलासा मिळू शकेल.