बेंगळूर/प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी बिहारमधील लोकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन देण्यापूर्वी भाजपने लॉकडाऊन दरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. सिद्धरामय्या यांनी बिहारमधील विधानसभा निवडणुकांमुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारच्या लोकांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली. आमच्या राज्यात निवडणुका न झाल्यामुळे त्यांना राज्यातील लोकांच्या आरोग्याची चिंता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्व केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा खोटं बोलण्यात तज्ज्ञ आहेत. मतासाठी भाजप कोरोनाच्या मोफत लसीचे आश्वासन देत आहे. याबद्दल मोदी काय म्हणतात याचा स्पष्टीकरण द्यावं असं ते म्हणाले.
सिद्धरामय्या यांनी आमच्या राज्यातील नागरिक केंद्र सरकारच्या डोळ्यासमोर खुपत आहेत. त्यांनी राज्यातील नागरिकांना मोफत लस घेण्याचा अधिकार नाही का असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे. प्रत्येक बाबतीत राज्यावर अन्याय होत आहे. केंद्राची ही वृत्ती कधी बदलेल हे सांगता येत नाही. राज्य सरकार आणि भाजप खासदार बहिरे आणि मुके झाले आहेत असं ते म्हणाले.
राज्यात एक प्रकारच मृत सरकार आहे. सरकार संधीसाधू राजकारण करीत आहे. येडियुरप्पा यांनी निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने दिली होती. भाजपमध्ये षडयंत्र सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार यांच्यात हिंमत असे तर त्यांनी राज्यातील नागरिकांना कोरोना मोफत लस द्यावी असे सिद्धरामय्या म्हणाले .