बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णाची संख्या थांबायचे नाव घेत नाही. राज्यात दररोज ५ हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. शहरामध्ये कोरोनाचे दररोज ३ हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत.
रुग्णवाढीमुळे बीबीएमपी प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे बीबीएमपीने लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
बेंगळूरमध्ये लसीकरण दर दिवसाला ३५ हजार इतका असताना बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांनी मंगळवारी सर्व विभागीय आयुक्तांना ही संख्या दुप्पट करून ७० हजार करण्याचे निर्देश दिले.
मंगळवारी आयुक्तांनी व्हिक्टोरिया हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी येथील तीन लसीकरण केंद्रापैकी एक लसीकरण केंद्रावर २०जण लसीकरण करण्यास आले आहोत. एवढी कमी संख्या पाहून गुप्ता यांना धक्का बसला. दरम्यान तीनही केंद्रांवर केवळ १००-१५० लोकांना लस देण्यात येत आहे.