बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर हिंसाचार प्रकरणी जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाने बुधवारी दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करत हा ‘पूर्वनियोजित कट’ असल्याचा आरोप केला आहे.
माजी पंतप्रधान आणि जद (एस) प्रमुख एच. डी. देवगौडा यांनी राज्य सरकारला यामध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कोणताही धर्म किंवा समुदाय कायद्यापेक्षा वरचढ नाही आणि जो कोणी देशाच्या कायद्याचा आदर करीत नाही त्याला शिक्षा केली जावी. असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच ही घटना पूर्व नियोजित कट असल्यासारखे दिसते आहे. पक्षाच्या नेत्यांनी राज्यात शांतता व सुसंवाद राखण्यासाठी सरकारला पाठिंबा दर्शविला असल्याचेही ते म्हणाले आहेत.