रस्त्याची दुर्दशा, रस्त्याशेजारी भलामोठा खड्डा पडल्याने वाहतुकीस धोका, दुरूस्तीची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
बेकिनकेरे-अगसगे या तीन किलो मिटरच्या संपर्क रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. अतिपावसाने एका वर्षातच रस्त्याच्या बाजूचा भराव वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती वाहनधारकांतून व्यक्त होत आहे. एका वर्षात रस्त्याची दुर्दशा झाल्याने रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया क्यक्त होत आहेत. या संपर्क रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरून आहे.
या संपर्क रस्ता तयार करून एक वर्षदेखील उलटले नाही, मात्र गतवषी पहिल्याच पावसात रस्त्याच्या बाजूचा मातीचा भराव वाहून गेल्याने रस्त्याशेजारी मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे येथून वाहने चालविणे वाहनधारकांसाठी धोक्मयाचे बनले आहे. जागोजागी रस्ता खचल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे तातडीने ठेकेदाराने लक्ष पुरवून रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील वाहनधारक व शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान रात्रीच्या अंधारात लहान-सहान अपघात घडत आहेत. या संपर्क रस्त्यावरून बेकिनकेरे, अतिवाड, चलवेनहट्टी, यासह चंदगड तालुक्मयातील कौलगे, बुक्कीहाळ, कागणी, किटवाड, होसूर या भागातील नागरिकांची वर्दळ असते. शिवाय एपीएमसी मार्केटला जाण्यासाठी हा रस्ता कमी आंतराचा असल्याने या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. मात्र पावसाळय़ात रस्त्याशेजारील भराव वाहून गेल्याने रस्त्याची रूंदी कमी झाली आहे. त्यामुळे येथून अवजड वाहने जाणे देखील धोक्मयाचे बनले आहे.
हा रस्ता शेतवडीतून गेल्याने शिवारात जाणाऱया शेतकऱयांची संख्यादेखील या रस्त्यावर अधिक आहे. शिवाय एपीएमसी मार्केटमध्ये शेतीमाल नेण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. त्यामुळे टॅक्टर व इतर वाहनांची संख्या वाढली आहे. नवीन तयार केलेला या रस्त्याची काही महिन्यातच दुर्दशा झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. गतवषी अतिपावसाने अनेक संपर्क रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे हे रस्ते वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. अशा रस्त्याची पावसाळय़ापूर्वी तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.