तारा केरकर यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
सिद्धी नाईक मृत्युप्रकरणात गोमेकॉच्या चार डॉक्टरांनी हलगर्जीपणा करून सिद्धीच्या पालकांची तसेच गोमंतकीयांची दिशाभूल केली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालात मृतदेह कधी आणला गेला याची नोंद डॉक्टरांनी का केली नाही. यात फक्त डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे घडले आहे. त्या चार डॉक्टरांचा हलगर्जीपणा असून बेजबाबदार डॉक्टरांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी समाजसेविका तारा केरकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
सिद्धी नाईकचा जेव्हा मृतदेह मिळाला आणि शवागृहात ठेवण्यात आला तेव्हा मृतदेह कितीवाजता घेऊन आले त्याबद्दल काहीच माहिती डॉक्टरांनी नोंद केली गेली नाही. यात फक्त त्या चार डॉक्टरांचा हलगर्जीपणा असून बेजबाबदार डॉक्टरांवर त्वरित कारवाई करावी. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चोर सोडून संन्याशाला धरले जात आहे. मृतदेह किती वाजता आणला गेला याबाबत का नोंद करण्यात आली नाही असा प्रश्न तारा केरकर यांनी उपस्थित केला आहे. चार डॉक्टरांचा या मृत्युप्रकरणात हात आहे. सरकार हे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय दिसून येत आहे. महिला व मुली या गोव्यात सुरक्षित नाही त्यासाठी भाजप सरकार जबाबदार आहे.
सिद्धी नाईक व सिमरन ही दोघेही आमच्या घरी 17 दिवस राहिल्या होत्या. सिद्धी नाईक जास्त फोनवर बोलत नव्हती अशी माहिती सिद्धी नाईक यांची मावस बहिणीने दिली.
मृतदेहावर जखमा काहीच नाही अशी माहिती पोलिसांनी दिली होती. परंतु जेव्हा शवविच्छेदानाचा अहवाल मिळाला त्यानंतर जखमा आहेत ते कळाल्या. त्यामुळे कळंगूट पोलिसस्थानकात सिद्धी नाईकची हत्या आहे अशी तक्रार नोंदविली. जेव्हा मी तिला बसमध्ये बसविल्यानंतर ती कुठे गेली हे सीसीटीव्ही फुटेजमधून कळावे. तसेच मॉल दी गोवाकडे पोहचली की नाही हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही सुरू करावी. तेथून ती कळंगूट येथे कशी गेली याबद्दल सीसीटीव्हीचे फूटेजमधून आम्हाला सांगावे अशी मागणी सिद्धी नाईकच्या वडिलांनी यावेळी केली. अजूनपर्यंत या प्रकरणात पोलिसांना धागेदोरे का मिळत नाहीत. याशिवाय म्हापसा बसस्टॅण्डवर सीसीटीव्ही कॅमेरा का नाहीत याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
कळंगूट येथून सिद्धी नाईकचा मृतदेह सरकारी रूग्णवाहिकेतून का आणली गेली नाही. डॉक्टरांनी फसवणूक का केली. अहवाल देण्यात त्यांनी का उशीर केला. ज्याचा या प्रकरणात हात आहे त्याला शोधून त्यावर कडक कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सिद्धी नाईकच्या वडिलांनी केली.