कॅप्टन ऑफ पोर्टसवर नागरीकांचा धडक मोर्चा
प्रतिनिधी /पर्वरी
बेती पणजी फेरीबोट सेवा काल अचानक बंद केल्याने येथील स्थानिक नागरिक संतप्त होऊन त्यांनी केप्टन ऑफ पोर्ट कार्यालयावर धडक मोर्चा नेला व फेरीबोट सेवा लवकरात लवकर सुरु करावी अन्यथा रस्ता रोखो करू असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.कसिनोच्या सोयी साठी अधून मधून फेरीबोट सेवा बंद करत असल्याचा आरोपही या संतप्त नागरिकांनी केला आहे.यावेळी साळगावाचे आमदार केदार नाईक तसेच वास्कोचे आमदार संकल्प आमोणकर संतप्त जमावाबरोबर उपस्थित होते.
बेती पणजी फेरीबोट सेवा ही पोर्तुगीज काळापासून सुरु असून वेरे,कांदोळी,साळगाव,पिळर्ण,बिठ्ठ?ण या भागातील सामान्य जनतेला ही फेरी सेवा खूप उपयोगाची आहे.त्यांना कामा निमित्य पणजीला जाण्या येण्या साठी खूप सोयीचे आहे.त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो.पणजी फेरी ध्क्क्याजवळ गेल्या कित्येक दिवस काम सुरु आहे.या कामामुळे अधूनमधून ही फेरीसेवा बंद ठेवली जाते.परिणामी लोकांना तासनतास ति÷त राहावे लागते.त्यांना कार्यालयात व घरी जाण्यासाठी उशीर होतो.त्यासाठी सरकारने ही फेरी सेवा नियमित सुरु ठेवावी अशी आग्रहाची मागणी येथील नागरिक करीत आहेत.
सरकार कसिनो मालकांची सोय करण्यासाठी ही फेरी सेवा बंद करीत आहे.त्यांच्यासाठी त्या जागेवर मोठी जेटी बांधण्याचे काम सुरु आहे.ती जेटी सुरु होण्यापूर्वीच ही फेरी सेवा बंद करण्याचा सरकारचा विचार आहे.सरकार त्यांच्या सोयीसाठी सामान्य जनतेची गैरसोय करीत आहे.गरीब,म्हाताऱया लोकांचे सरकारला कोणतेच सोयरेसुतक नाही.असा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे.
सरकारने ही फेरीसेवा अखंडित सुरु ठेवावी तसेच यापुढे सामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना बंदर कप्तान अधिकाऱयांना केली.तसेच लोकांना वेठीस धरू नये असे. आमदार केदार नाईक यांनी सांगितले. मोर्चेकाऱयाचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर यापुढे प्रवाशांना कोणत्याच अडचणीना सामोरे जावे लागणार नीही याची दखल घेतली जाईल.फेरी सेवा नियमित सुरु ठेवणार असल्याचे आश्वासन बंदर कप्तान अधिकाऱयाने मोर्चेकाराना दिले आहे.