कोरोनाच्या धोक्यामुळे जिल्हाधिकाऱयांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर 25 ते 27 नोव्हेंबरदरम्यान भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. बेळगावमधून कार्तिकी एकादशीनिमित्त पालख्या, दिंडी नेण्यात येऊ नये. तसेच वारकऱयांनीही पंढरपूरला या काळात जाऊ नये. तेथील प्रशासनाने दि. 24 ते 26 दरम्यान 144 कलम लागू केले आहे, असे बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कळविले आहे.
कोरोनाच्या सावटामुळे मंदिरे अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आली होती. आता मंदिरे खुली करण्यात आली असली तरी गर्दी होण्याची शक्मयता लक्षात घेऊन सोलापूरच्या जिल्हाधिकाऱयांनी 25 ते 27 दरम्यान 3 दिवसांसाठी विठ्ठल दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 24 ते 26 दरम्यान 144 कलमान्वये जमाव बंदी जारी केली आहे.
आषाढी व कार्तिकी एकादशीला बेळगावमधून असंख्य भाविक, वारकरी पंढरपूरला जातात. मात्र, सोलापूर प्रशासनाने विठ्ठलाचे दर्शन घेण्यावर निर्बंध आणले आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या वारकऱयांनी पंढरपूरला जाऊ नये तसेच दिंडी आणि पालखी नेऊ नये, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्पष्ट केले आहे.