1 हजार 152 नागरिकांचा समावेश : रेल्वेस्थानक परिसरात मोठी गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येला भेट देण्यासाठी शुक्रवारी बेळगावमधून भाविक रवाना झाले. बेळगाव व खानापूर तालुक्मयातील 1 हजार 152 नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे अयोध्या, काशी, त्रिवेणीसंगम येथे निघाली. यामुळे सकाळी 9 च्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरात मोठी गर्दी झाली होती.
बेळगावमधील नागरिक मागील 6 ते 7 वर्षांपासून अयोध्येसह उत्तर भारतात देवदर्शन व पर्यटनासाठी जातात. दरवषी या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱयांची संख्या वाढत आहे. तिकीट व जेवणाचा खर्च सर्वांमध्ये विभागला जातो. बेळगाव व खानापूर तालुक्मयाच्या प्रत्येक गावातील नागरिकांचा यामध्ये सहभाग आहे.
शुक्रवारी सकाळी बेळगावमधून विशेष रेल्वेने भाविक रवाना झाले. या रेल्वेला एकूण 12 डबे जोडण्यात आले आहेत. त्यांना पाठविण्यासाठी नातेवाईक जमा झाल्याने रेल्वेस्थानक परिसरात गर्दी झाली होती. रेल्वेच्या इंजिनची फुलांनी व केळीच्या झाडांनी सजावट करण्यात आली. उपस्थित वारकऱयांच्या आरतीने प्रवास सुरू करण्यात आला. प्रयागराज, काशी, त्रिवेणीसंगमला भेटी देऊन पुन्हा रेल्वेने बेळगावला परतणार आहेत.