वार्ताहर / किणये
पावसाळय़ाला सुरुवात झाली की साऱयांना वेध लागतात ते म्हणजे नैसर्गिक अळंबीचे. पडिक जमीन, शेत-शिवार व डोंगर भागात मिळणारी ही अळंबी खाण्यासाठी अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली असते.
बेळगाव परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू झाला असून बाजारात अळंबीही दाखल झाली आहेत. बस्तवाड (हलगा) येथील एक शेतकरी गुरुवारी दुपारी बेळगावच्या नरगुंदकर भावे चौकात अळंबी विक्री करीत होता.
नुसती अळंबी म्हटली तरी तिची चव जिभेवर रेंगाळू लागते. यामुळे अळंबींनी बाजारात मोठय़ा प्रमाणात मागणी असते. गुरुवारी एका पोत्यातून अळंबी घेऊन आलेल्या त्या शेतकऱयाजवळ अळंबी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. बघता बघता काही वेळातच त्या शेतकऱयाजवळच्या अळंबीची उचल झाली.
प्रतिकिलो 600 रुपये तसेच 80, 100 व 150 रुपये एक वाटा याप्रमाणे त्या शेतकऱयाने अळंबी विक्री केली.
एरवी कृत्रिमरीत्या तयार केलेली मशरुम खाणाऱया खवय्यांसाठी थोडय़ा प्रमाणात उपलब्ध झालेली ही नैसर्गिक अळंबी खरेदी करण्याचा योग आला. पावसामुळे अळंबी उगवत असून आता यापुढे अधूनमधून अळंबी शेत-शिवारात सापडतात, अशी माहिती त्या शेतकऱयाने दिली.
अमावस्या व पौर्णिमेला अळंबी जमिनीतून अधिक प्रमाणात उगवून बाहेर येतात, असेही काही शेतकऱयांचे म्हणणे आहे.