ऑनलाईन टीम / बेळगाव :
बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या संस्थात्मक विलगीकरणाचा कालावधी 7 दिवस करण्याचा निर्णय बेळगाव जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने घेतला आहे.
इतर ठिकाणांहून बेळगावात दाखल झालेल्या आणि संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्या नागरिकांची पाच ते सहा दिवसात कोरोना टेस्ट केली जाईल. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर त्यांना पुढील सात दिवस घरीच क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मात्र, या नव्या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच होणार नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
बेळगाव जिल्ह्यात संस्थात्मक क्वारंटाईनसाठी वसतिगृह, शासकीय इमारती आणि हॉटेल्सचा ताबा घेण्यात आला आहे. मात्र, ही जागा अपुरी पडत असल्याने इतर ठिकाणांहून बेळगाव जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना 14 दिवसांऐवजी 7 दिवसच क्वारंटाईन करण्यात येईल. सध्या 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्या नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन केले जाते. संस्थात्मक विलगीकरणाची जबाबदारी पालिकेवर आहे. त्यामुळे7 दिवसांच्या नव्या नियमावलीमुळे पालिकेवरील ताण कमी होईल. मात्र, आरोग्य प्रशासनाचे काम वाढणार आहे.