अधिकतर दुचाकींचा समावेश : बिना मालवाहतूक संख्याही मोठी
प्रतिनिधी /दीपक बुवा
ब्रिटिश कारभाऱयांनी वाहतुकीला नियम घालण्यासाठी आणि कर गोळा करण्यासाठी या कार्यालयाची स्थापना केली आहे. बेळगाव येथील आरटीओ कार्यालयाचीही स्थापना सुमारे 1940 च्या दशकात झाली. कालांतराने याचा विस्तार वाढत गेल्याने जिल्हय़ात पाच आरटीओ कार्यालयाची स्थापना करण्यात आली. आता सध्या बेळगाव आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 6 लाख 5 हजार 421 वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यामधील मालवाहतूक न करणारी वाहने 5 लाख 62 हजार 554 आहेत.
बेळगाव कार्यक्षेत्रात आतापर्यंत या ठिकाणी 56 अधिकाऱयांनी या पदाचा कारभार सांभाळला आहे. जिल्हय़ाचा विस्तार वाढल्याने जिल्हय़ातील वेगवेगळय़ा ठिकाणी आरटीओ कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. तर बेळगाव कार्यक्षेत्रात बेळगाव आणि खानापूर तालुक्मयाचा समावेश करण्यात आला असून या दोन्ही तालुक्मयांमध्ये मिळून सुमारे 6 लाख वाहने रस्त्यावर फिरत आहेत.
बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात चारचाकी, दुचाकी वाहने मोठय़ा प्रमाणात आहेत. आरटीओ कार्यक्षेत्रात बेळगाव आणि खानापूर तालुक्मयाचा समावेश आहे. तालुक्मयांमध्ये 6 लाख 5 हजार 421 वाहने रस्त्यावर फिरतात. यामध्ये चारचाकी, दुचाकी, रिक्षा आणि इतर अवजड वाहनांचा समावेश आहे. मात्र ही सर्व वाहने पेट्रोलवर किंवा डिझेलवर चालतात. मात्र या सर्व वाहनांमुळे पर्यावरणाचा ऱहासच होतो.
नुकताच कोरोनामुळे दुसऱया लाटेत ऑक्सिजनविना अनेकांचा मृत्यू झाला. अशातच वाढत्या पेट्रोल व डिझेल दरामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विचार करणेही तितकेच गरजेचे आहे. 42 हजार 867 वाहने अवजड व लघू अवजड वाहतूक वाहने आहेत. याचबरोबर दुचाकींची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढल्या असून त्यांची संख्या 4 लाख 81 हजार 588 इतकी आहे. याचबरोबर ट्रॉर्न्स्पोट करणाऱया वाहनांची संख्या 42 हजार 867 इतकी आहे. त्यामुळे बेळगावात मोठय़ा प्रमाणात वाहनांची संख्या आहे.
अवजड वाहतूक करण्यासाठी तब्बल 9 हजार 426 वाहने आहेत. मध्यम गुड्स वाहतूक करणारी 9 हजार 910 वाहने असून ऑटोरित्रा व मॅक्सिकॅब अशी एकूण 7 हजार 897 वाहने आहेत. यासह इतर वाहनांचाही यामध्ये समावेश आहे. मागील 15 वर्षांपूर्वी संपूर्ण जिह्यात इतकी संख्या होती. आता एका आरटीओ कार्यक्षेत्रात इतक्मया मोठय़ा प्रमाणात ही संख्या वाढली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विचार केल्यास समस्या निर्माण होण्याची शक्मयताही नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव येथील आरटीओ कार्यालय सुमारे 80 वर्षांपूर्वीचे आहे. येथील आरटीओ कार्यालयात 56 हून अधिक अधिकाऱयांनी पदभार स्वीकारला आहे. सध्याचे आरटीओ म्हणून शिवानंद मगदूम आहेत. ब्रिटिश काळापासून साधरणता 1985 सालापर्यंत वाहने कमी असली तरी रस्ते वाहतूक करणाऱयांकडून कर लावावा आणि नियम लागावेत हाच यामागचा उद्देश आहे. तेंव्हापासून कायद्यांमध्ये बदल झाला आणि मोठय़ा प्रमाणांत वाहनांची संख्या वाढली. त्यानंतर आता तर प्रत्येकी घरात दोन ते तीन वाहने आहेत. त्यामुळे ही संख्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होत नसले तरी पर्यायी मार्गावर अवलंबून राहण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत आहे.
कालांतराने वाहने वाढली आणि येथील कामकाजाचा बोजाही वाढला. त्यामुळे जिह्याचे मुख्य आरटीओ कार्यालय करण्यात आले. त्यातही आता बरेच बदल झाले आहेत. जिह्यात कोणत्याही ठिकाणी वाहन घेतल्यास त्या त्या आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन घेण्याची व्यवस्था करण्यात आली. आता याकडे गांभीर्याने लक्ष देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत आहे.
प्रत्येकी माणसाला एक वाहन
प्रादेशिक वाहतूक कार्यालय क्षेत्रात आतापर्यंत 6 लाखांहून अधिक वाहने सद्य परिस्थितीत आहेत. वाहनांची संख्या वाढतच आहे. काही वाहने जुनी झाल्याने ती सरकारजमा करण्यात आली असली तरी आता अवस्था झाली आहे. त्यामुळे कामाचा ताणही वाढला आहे.
– आरटीओ-शिवानंद मगदूम