खासगी वाहनांचा आधार : बससेवा सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा व राज्यांतर्गत बससेवा सुरळीत असली तरी मागील दीड वर्षापासून बेळगाव-कोकण बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. विशेष करून बेळगाव-चंदगड तालुक्मयाच्या सीमाहद्दीवरील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोकणसह चंदगड तालुक्मयातील प्रवाशांना शिनोळी (ता. चंदगड) पर्यंत बसने प्रवास करून तेथून बेळगावला येण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
कोकणातून दररोज बेळगावला येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. कोरोनाआधी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, रेड्डी आदी बस धावत होत्या. शिवाय कोकणातून बेळगावकडे धावणाऱया बसची संख्यादेखील अधिक होती. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना सोयीस्कर ठरत होते. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बेळगाव-कोकण बससेवा काही दिवस वगळता बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागत आहे. दरम्यान, काही खासगी वाहनधारक प्रवाशांकडून अधिक तिकीट घेऊन लूट करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
बेळगावातून कोकणात धावणाऱया बसेसला प्रवाशांचा प्रतिसादही समाधानकारक होता. त्यामुळे बेळगाव आगाराला कोकणात धावणाऱया बसच्या माध्यमातून चांगला महसूल मिळत होता. मात्र बससेवा थांबल्याने महसूलही थांबला आहे.
महाराष्ट्रात मर्यादित बससेवा
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर प्रवाशांना आरटीपीसीआर बंधनकारक आहे. तसेच बसस्थानकातील महाराष्ट्रातील काही मोजक्मयाच शहराकडे बससेवा धावत आहे. अलिकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवेबरोबर कोकणातील बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशातून होत आहे.