तीन अपघातात वाहनांची नुकसानी
प्रतिनिधी /वाळपई
गोवा बेळगाव दरम्यानच्या चोर्ला महामार्गावर रविवारी अपघातांची मालिका पहायाला मिळाली. रविवारी संध्याकाळच्या सत्रात जवळपास तीन अपघातात अनेक वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती हाती आलेली आहे .
मात्र जीवित हानी झाली नसून वाहनांची मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेली आहे .रविवारी अचानकपणे अपघातांची मालिका या महामार्गावर पहावयास मिळाल्यामुळे प्रश्न निर्माण झालेले आहेत .
दरम्यान उत्तर गोवा जिल्हाधिकारी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन चोरला भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पर्यटक धबधब्यावर जाऊन दंगामस्ती करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून यामुळेच सदर महामार्गावर रविवारी अपघातांची मालिका घडल्याचे नागरिकांनी सांगितले.
याबाबतची माहिती अशी की गोवा कर्नाटक दरम्यान दोन्ही राज्यांना जोडणारा चोरला महामार्ग सध्यातरी वाहनांच्या दृष्टिकोनातून वर्दळीचा ठरलेला आहे. सध्या गोव्यामध्ये कोवीड रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे परराज्यातील नागरिक मोठय़ा प्रमाणात गोव्यात येत आहेत. पर्यटकांसाठी रविवार हा चांगला दिवस असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात पर्यटक गोव्यामध्ये येत असतात. सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे चोरला भागातील निसर्ग सौंदर्य सर्वांनाच आकर्षित करणारे ठरत असल्यामुळे डोंगराच्या कपारीतून धबधबे कोसळत असल्यामुळे याभागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पर्यटक याचा आनंद लुटताना दिसत आहेत. आज रविवारी संध्याकाळच्या सत्रात एकूण तीन अपघात पहावयास मिळाले. याबाबत नागरिक व पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अपघातात हे समोरासमोर झाल्यामुळे वाहनांची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली तर एका चारचाकी वाहनाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. यामुळे वाहनांची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली.
याबाबतची माहिती मिळताच वाळपई व केरी याठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन ठप्प झालेल्या वाहतूकीचा मार्ग मोकळा करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दारूच्या नशेत अपघात घडतात. दरम्यान याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी हा मौजमजेचा दिवस असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिक मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवत असतात. यामुळे खास करून रविवारी अपघात घडत असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे या महामार्ग शेजारी मोठय़ा प्रमाणात धबधबे कोसळू लागलेले आहेत. या धबधब्याचा आनंद लुटताना दारू पिऊन व त्यानंतर वाहने चालविण्याचा प्रकार घडत असल्यामुळे अपघात घडतात .आज अपघातांची मालिका हा सुद्धा असाच प्रकार असल्याचे सांगितले .दरम्यान वाळपई पोलिस यंत्रणेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या महामार्गावर रविवारी संध्याकाळच्या तीन अपघात घडले .मात्र कुणालाही मार बसलेला नाही. मात्र महानांची मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे पोलिसांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.