उचगावात शिवमूर्ती आगमन सोहळा
भव्य-दिव्य मिरवणुकीद्वारे पारंपरिक संस्कृतीचे विराट दर्शन
खास शिवजयंतीचे औचित्य साधून भगवा रक्षक युवक मंडळ लक्ष्मी गल्ली, उचगाव यांच्यावतीने चार फुटी छत्रपती शिवाजी महाराजांची नवीन मूर्ती आणण्यात आली. या मूर्ती आगमन सोहळय़ाची भव्य दिव्य मिरवणूक सोमवार दि. 2 रोजी सायंकाळी 6 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघाली. यावेळे पारंपरिक सांस्कृतीचे दर्शन घडवत ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी मिरवणुकीला सुरुवात झाली.
या सोहळय़ात कडोली येथील शिवमुद्रा ढोल-ताशा, ध्वज पथक, काकती येथील खास बैलजोडी, लाठीमेळा, करेला, अश्व, धारकरी वेशातील युवक, पारंपरिक पद्धतीने नटलेल्या महिला, मर्दानी खेळ आणि धारकरी अशा भव्य दिव्य पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत मिरवणूक निघाली. मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य बंटी पावशे, विनोद कोळी, अक्षय देसाई, राकेश बांदिवडेकर, सूरज होनगेकर, बाबाजी मुतकेकर, ओमकार गिरी, गजानन जाधव, मनोज चौगुले, राहुल सुभेदार, मिलिंद देसाई, धनंजय जाधव, प्रदीप पाटील यांच्या हस्ते मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीची गणपत गल्ली, गांधी चौक आणि लक्ष्मी गल्ली येथे सांगता झाली.
सूत्रसंचालन एन.ओ.चौगुले यांनी केले. अश्वावर विराजमान स्वराज परशुराम जाधव या तीन वर्षीय बालकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बैलगाडय़ा व बैलजोडी पाहण्यासाठी शेतकऱयांनी गर्दी केली होती.
कंग्राळी बुद्रुकमध्ये शिवमूर्तीला अभिषेक
कार्यकर्त्यांच्या ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणांनी परिसर दुमदुमला
येथील शिवप्रेमी युवक मंडळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा व ग्रामस्थांच्यावतीने अश्वारुढ शिवमूर्तीला रंगरंगोटी व अभिषेकाचा संयुक्त कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन परिसर शिवमय करण्यात आला.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण प्रत्येक तरुणांमध्ये बिंबवणे काळाची गरज आहे. सर्वधर्मियांचे राजे शिवाजी महाराजांमुळे आज हिंदू संस्कृती अबाधित आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचे अवलोकन करत राज्य चालविल्यास देशाचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.
महाराजांची अश्वारुढ मूर्ती व चबुतऱयाच्या रंगकामामुळे गावात प्रत्यक्ष शिवाजी महाराज अवतरल्याचा भास होत आहे. यावेळी शिवप्रतिष्ठानचे धारकरी आकाश पाटील व किरण कोळी दाम्पत्यांच्या हस्ते होमहवन व पूजन करून मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोल्हापूरचे 87 वर्षीय शाहीर नारायण कुलकर्णी यांनी पोवाडे गायिले. यावेळी ग्रा.पं. उपाध्यक्ष अनिल पावशे, सदस्य दत्ता पाटील, दादासाहेब भदरगडे, नवनाथ पुजारी, यल्लोजी पाटील, प्रदीप पाटील, यल्लाप्पा पाटील, मयूर बसरीकट्टी, गजानन पवार, कल्लाप्पा पाटील, मल्लाप्पा निलजकर, शंकर पाटील, निरंजन जाधव, बसवंत पाटील, प्रवीण चव्हाण, योगेश पवार, ओमकार पाटील, संजय कडोलकर, यल्लाप्पा मासेकर, मनोहर कडोलकर, अनिल कडोलकर, बापू पाटील, नागेश पावशे, बाळू पाटील, गोपाळ पाटील, मोहन भैरटकर, युवराज हुद्दार, सोमनाथ हुद्दार, शंकर हुद्दार, गणेश अष्टेकर, राजू मन्नोळकर, सदानंद चव्हाणसह शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.
अश्वारुढ शिवमूर्तीची बाळेकुंद्री खुर्दमध्ये प्रतिष्ठापना
बाळेकुंद्री खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मंगळवार दि. 3 रोजी 14 फुटी अश्वारुढ शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रविवार दि. 1 रोजी संतिबस्तवाड येथून अश्वारुढ शिवमूर्ती आणण्यात आली होती. सोमवार दि. 2 रोजी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी क्रेनच्या साहाय्याने चौथऱयावर मूर्ती बसविण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. युवराज जाधव यांनी शिवमूर्तीला पुष्पहार घालून पूजन केले. यावेळी गावातील सर्व युवक मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जांबोटी येथे शिवजयंती
येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने पारंपरिक पद्धतीने सोमवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवप्रतिष्ठान-हिंदुस्थान जांबोटी शाखेचे अध्यक्ष मनोहर गोवेकर, संजय गावडे, मलिकार्जुन मुतगी, सचिन कुडतुकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करून मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराजांची आरती करून प्रेरणा मंत्राचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकर्त्यांना प्रभाकर बिर्जे यांनी शिवचरित्राबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला जांबोटी ग्राम पंचायत अध्यक्ष महेश गुरव, ग्रा. पं. सदस्य मंजुनाथ मुतगी, शिवाजी हणबर, मिलिंद डांगे, राजू डांगे, पवन गुरव, सुधाकर गावडे, आमटे ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष शिवाजी गावकर, मिथुन कुंभार, मदन कुडतूरकर, राजू कुर्लेकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
किणयेत शिवजयंती उत्साहात
छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी मुघलांच्या काळात हिंदू साम्राज्याची स्थापना केली तरी ते परधर्म सहिष्णू होते, असे मत बेळगावच्या ग्रामीण क्षेत्राच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. किणये गावात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी स्वामी विवेकानंदांनी शिवाजी महाराजांबद्दल सांगितलेल्या वाक्मयाची आठवण करून दिली. शिवाजी हे नाव नसून युवा शक्तीचे आदर्श आहेत. महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी अनेक नियम व कायदे लागू केल्याचेही सांगितले. या कार्यक्रमात गावातील ज्ये÷ नागरिक, युवराज पाटील, युवराज कदम, मारुती डुकरे, महेश डुकरे, नामदेव डुकरे, संतोष पाटील, अनिल पाटील, रामलिंग दळवी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आंबेवाडी येथे शिवज्योतीचे स्वागत
आंबेवाडी येथील श्री राजा शिवछत्रपती दत्त युवक मंडळाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवज्योत आणण्यासाठी शिवभक्त महिपाळगडला रवाना झाले होते. त्यानंतर सोमवारी गावामध्ये शिवज्योतीचे स्वागत करून गावातील विविध मंदिरांमध्ये पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर मिरवणुकीची सांगताप्रसंगी विधिवत पूजनाने महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालून पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवभक्त, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
काकती-होनग्यात शिवजयंती साजरी
काकती-होनग्यात विविध उपक्रमांचे आयोजन करून मोठय़ा उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. काकती-होनगा ग्रा. पं.वतीने शिवप्रतिमा व शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य व शिवप्रेमी उपस्थित होते.
काकतीत छत्रपती शिवाजी पुतळा स्मारक चौक येथे सायंकाळी महिलांकडून बाल शिवाजीचा जन्मोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रा. पं. उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर, सदस्या ज्योती गवी, सुनीता गवाणी, सरिता कोचेरी व महिलांनी पाळणा कार्यक्रमात सहभाग दर्शविला.
पालखी सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर देवस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष सिद्दाप्पा टुमरी (गाडेकर) होते. ग्रा. पं. अध्यक्ष सुनील सुणगार जि.पं. माजी सदस्य सिद्दगौडा सुणगार आदींनी पालखी पूजन केले. जि. पं. माजी सदस्य सिद्दगौडा सुणगार म्हणाले, छत्रपतींनी स्वराज्यात दीन-दुबळय़ांना, कष्टकरी शेतकऱयांना न्याय मिळवून दिला. महाराजांनी कधीच जातीभेद केला नाही. छत्रपतींचे कार्यकर्तृत्व सर्वांनी समजून घेणे काळाची गरज आहे. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील म्हणाले, रयतेच्या कल्याणाचे स्वराज्य निर्माण करण्याचे संस्कार जिजाऊंनी शिवबांवर रुजविले. राष्ट्रभक्तीचा हाच अंगार छत्रपतींनी आपल्या सवंगडय़ांमध्ये पेटवून असामान्य, अलौकिक स्वराज्य साकारले, असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन मनोहर परमोजी यांनी केले.
शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळय़ाला रात्री शानदार सुरुवात झाली. अठरा पगड जाती-जमातींचा वेश परिधान केलेले मावळे, ढोल-ताशा, लाठी-करेला मर्दानी खेळ, वारकरी मंडळी पालखी सोहळय़ात सहभागी झाले होते. गल्लोगल्ली सुवासिनींनी पालखीचे पूजन करून आरती ओवाळली. रात्री उशिरा 11 वाजता प्रेरणा मंत्राने शिवस्मारकसमोर सोहळय़ाची सांगता झाली. यावेळी शिवप्रेमी महिला उपस्थित होत्या.
शिवरायांकडून सर्वधर्मियांना समान वागणूक
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सर्वधर्मियांचे रक्षण झाले. जिजाऊ साहेबांमुळे भारतमातेचे रक्षण झाले. रयतेचा राजा शिवाजी महाराजांची शून्यातून विश्व निर्माण करून सर्व धर्मियांना अमूल्य शिकवण दिली. शिवाजी महाराज व जिजाऊंमुळेच देशात हिंदु संस्कृती नांदत असल्याचे परखड विचार पुण्याचे शिवचरित्र व्याख्याते सौरभ करडे यांनी व्यक्त केले.
कंग्राळी बुद्रुक येथील शिवप्रेमी युवक मंडळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व ग्रामस्थांच्यावतीने सोमवारी शिवजयंतीनिमित्त व्याख्यान आयोजिण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मल्लाप्पा पाटील होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर, श्रीराम सेना बेळगाव जिल्हा अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले, उपाध्यक्ष अनिल पावशे, सदस्य नवनाथ पुजारी, यल्लोजी पाटील, दत्ता पाटील, दादासाहेब भदरगडे, उमेश पाटील, माऊली सोसायटी अध्यक्ष प्रभाकर पाटील, किरण तरळे, यल्लाप्पा जाधव, कल्लाप्पा कडोलकर, महादेव पाटील उपस्थित होते.
मुलींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्याख्याते सौरभ करडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून ऍड. सुधीर चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. शिवभक्त कल्लाप्पा पाटील 21 वर्षांपासून अश्वारुढ शिवमूर्तीची अखंड पूजा करत असल्याबद्दल प्रशंसा करण्यात आली. सौरभ करडे यांचा मल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन खास सत्कार करण्यात आला.
यांच्या आठवणीने येईल ताकद
आऊसाहेब जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडवले. मोगलाई व ब्रिटिश राजवटीत महिलांवर फार अत्याचार झाले. हे अत्याचार थांबविण्याचे महान कार्य शिवाजी महाराजांनी केले. महिलांवर अशी वेळ आल्यास त्यांनी राणी कित्तूर चन्नम्मा, झांशीची राणी लक्ष्मीबाई व जिजाऊसाहेब यांची आठवण करावी. त्यांच्यात शंभर हत्तींचे बळ येईल व अन्याय दूर होईल, असाही सल्ला सौरभ करडे यांनी उपस्थित महिलांना दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रेमी युवक मंडळाचे कार्यकर्ते, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मनोळकर यांनी केले, आभार शंकर कोनेरी यांनी मानले.