रुग्ण वाढल्याने भीतीदायक वातावरण : आरोग्य खात्याची उडाली झोप : नागरिकांनीही गांभीर्य घेणे गरजेचे
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिह्यात मंगळवारी तर तब्बल 404 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये बेळगाव तालुक्यातील 140, शहरातील 119 आणि खानापूर तालुक्यातील 145 जणांचा समावेश आहे. यावषी पहिल्यांदाच मोठय़ा संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. याचबरोबर आता मास्क न वापरल्यांवर कारवाई करण्याची सुरूवात करण्यात आली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. धोक्मयाची घंटा आता वाजू लागली आहे. त्यासाठी जनतेने सावध होणे गरजेचे आहे. एकाच दिवशी इतका मोठा आकडा आल्यामुळे प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सर्व बाबतीत प्रयत्न करत आहेत. पण जनतेनेही त्यांना साथ देणे गरजेचे आहे.
मास्क घातले नाही म्हणून आता काही ठिकाणी अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र दंड आकारुन चालणार नाही तर प्रत्येकाने सावधानता बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा मागील वेळेपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. तेंव्हा आता जनतेनेच सावध व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
खानापूर तालुक्यातील 145 आढळल्यामुळे तातडीने जिल्हाधिकाऱयांनी त्या ठिकाणी आरोग्य, पोलीस आणि नगरपालिका यांची बैठक घेऊन अधिकाऱयांना सुचना केल्या आहेत. मात्र सुचना करुन त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जनतेनेही यासाठी स्वयंस्फुर्तीने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
मंगळवारी गौंडवाड, निलजी, मच्छे, तुरमुरी, बेळगाव सरस्वतीनगर, शिंदोळी, हिंदवाडी, जाधवनगर, खडेबाजार, महांतेशनगर, टिळकवाडी, मठ गल्ली, नानावाडी, जुना गांधीनगर, आर. सी. नगर, सदाशिवनगर, कॅम्प, रामतीर्थनगर, रुक्मिणीनगर, सदाशिवनगर, समादेवी गल्ली, संगमेश्वरनगर, शहापूर, आनंदनगर-वडगाव, अंजनेयनगर, अयोध्यानगर, भाग्यनगर, चिदंबरनगर, गोडसेनगर, हनुमाननगर, गोवावेस, श्रीनगर, शिवाजीनगर, शिवबसवनगर, उद्यमबाग, उज्वलनगर या परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. खानापूर तालुक्मयातील अबनाळी या गावामध्ये तब्बल 145 रुग्ण आढळले आहेत. तेंव्हा आता प्रत्येकानेच याबाबत सावधानता बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोनालाही आपणही बळी पडु शकतो. आरोग्य विभागाने आणि सरकारने घातलेले कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा मागील वषीप्रमाणेच परिस्थिती होणार आहे.