केंद्राकडे महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा
बेळगाव : बेळगावचे नामांतर बेळगावी कर्नाटक सरकारने केले. त्याला महाराष्ट्र सरकारने विरोध केला नाही. मात्र आता केरळ राज्याने कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असलेल्या कन्नड भाषिक गावाचे नामकरण करण्याचा अध्यादेश काढला आहे. त्याला कर्नाटक सरकारने सर्व ताकदीनिशी विरोध केला आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने याबाबतीत काहीच केले नाही. तेव्हा आता महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सर्व ताकदीनिशी जाब विचारावा, अशी मागणी म. ए. समितीचे कार्यकर्ते सूरज कणबरकर यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर आम्हा सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. हुतात्म्यांचा घोर अपमान केला आहे. कारण केंद्रात भाजप सरकार आल्यानंतरच बेळगावचे बेळगावी असे नामकरण झाले आहे. आता महाराष्ट्र सरकारने सर्व ताकदीनिशी याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून बेळगावीचे बेळगाव करावे, अशी मागणी केली आहे.