न्यायालयाच्या आवारात हवी आहे सुरक्षा : दिल्ली येथील घटनेनंतर बेळगावातील वकिलांनी केली मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
दिल्ली येथील न्यायालयामध्ये गँगवारमधून एकावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी वकिलांच्या पोशाखामध्ये हल्लेखोर आले होते. हल्लेखोरांनी अचानकपणे हे कृत्य केले. त्यामुळे पोलिसांनी त्या हल्लेखोरांवर गोळीबार केला. या घटनेत दोन हल्लेखोरांचा मृत्यू झाला आहे. भर न्यायालयातच ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले. यामध्ये एक वकीलही गंभीर जखमी झाला आहे. अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. तेव्हा वकिलांना संरक्षण देण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे मत वकिलांनी व्यक्त केले.
भर न्यायालयात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव न्यायालयातही यासाठी पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे. वकील हे असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. बेळगाव न्यायालयाच्या आवारातही अशा घटना गँगवारमधून घडल्या होत्या. याचबरोबर बऱयाचवेळा वादावादीही होत आहे. तेव्हा वकिलांना संरक्षण देण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी ऍड. सचिन शिवण्णावर यांनी केली.
बेळगाव न्यायालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आवारासह न्यायालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ यांच्यासह इतर ज्ये÷ वकिलांनी केली आहे.