राष्ट्रीय महामार्ग रोखून केला निषेध, पोलिसांकडून अटक-सुटका
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱयांना शेत मजूर बनविणारे भू-सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा तातडीने रद्द करावा यासाठी जिल्हय़ातील विविध शेतकरी संघटनांनी तसेच इतर पक्षांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडले. राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. भर उन्हात अर्धनग्न होवून शेतकऱयाची अवस्था दाखविली. शेतकऱयांची काळजी असेल तर तातडीने हे विधेयक रद्द करा, अन्यथा शेतकरी आपला हिसका सरकारला दाखवतील, असा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱयांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. तर ग्रामीण भागात बंदला प्रतिसाद मिळाला.
पोलिसांच्या दडपशाहीतील शेतकऱयांनी आपला उदेक दाखवून दिला. सरकारने वेळीच जागे व्हावे केंद्र आणि राज्य सरकारचा पायउतार करू, असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे. विधेयक जर मागे घेतले नाही तर संपूर्ण देशातील शेतकरी हिसका दाखवतील, असा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी संघटनांनी बेळगाव बंदची हाक दिली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची तयारी रात्रीपासूनच केली होती.
बॅरिकेड्स लावून नाकाबंदी
जिल्हय़ातील इतर तालुक्मयातून शेतकरी बेळगावात येवू नये, यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात आली होती. तरी देखील शेतकरी वाहनांनी बेळगावात दाखल झाले. त्यांनी कित्तूर चन्नम्मा चौक येथे सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. चाबूक वाजवून सरकारला इशारा देण्यात आला आहे. कित्तूर चन्नम्मा चौक येथे रयत संघटनांबरोबरच इतर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, विविध दलित संघटना यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
सुवर्णसौध परिसरातही कडेकोट पोलीस बंदोबस्त
सुवर्णसौधवर शेतकरी मोर्चा काढणार होते. त्यामुळे सुवर्णसौध परिसरातही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कित्तूर चन्नम्मा चौकपासून सुवर्णसौधपर्यंत विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनांची तपासणी केली जात होती. तरी देखील शेतकरी छुप्या मार्गाने दाखल होत होते. दुपारी 12 नंतर शेतकऱयांनी आपला मोर्चा सुवर्णसौधकडे वळविला.
राष्ट्रीय महामार्गावरच ठाण मांडले
अलारवाड क्रॉसजवळ येताच शेतकऱयांनी राष्ट्रीय महामार्गावरच ठाण मांडले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. शेतकऱयांनी रास्तारोको करताच दोन्ही बाजूला हलगा आणि जुने गांधीनगरजवळ वाहतूक अडवून ठेवण्यात आली. शेतकरी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही शेतकरी अर्धनग्न होवून सुवर्णसौधकडे चाल करत होते. तर काहीजण आत्महत्या करतील अशी भीतीदेखील निर्माण झाली होती.
200 हून अधिक शेतकऱयांना अटक
काही शेतकऱयांना पोलिसांनी बसमध्ये कोंबून बागेवाडी पोलीस स्थानक व इतर ठिकाणी नेले. यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी शेतकऱयांनी केली. सुवर्णसौधसमोर काही शेतकरी विविध भागांतून दाखल झाले. मात्र तेथेच त्यांना ताब्यात घेण्यात आले. एकूणच पोलिसांनी पूर्ण ताकदीनिशी हे आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले. 200 हून अधिक शेतकऱयांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे हे स्वतः शेतकऱयांच्या या आंदोलनावर लक्ष देवून होते. इतर पोलीस अधिकाऱयांना ते वेळोवेळी सूचना करत होते. राष्ट्रीय महामार्ग रोखू नये यासाठी प्रयत्न करत होते. मात्र शेतकऱयांनी जवळपास अर्धातासहून अधिकवेळ हा महामार्ग रोखून धरला. पोलीस फौजफाटा सर्वत्र ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न करण्यात आले.
या मोर्चामध्ये रयत संघटनेचे चुन्नाप्पा पुजेरी, राघवेंद्र नाईक, रवी सिद्धमण्णावर, प्रकाश नाईक, जावेद मुल्ला, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेपेटरी नागेश सातेरी, राजू मरवे, आप्पासाहेब देसाई, जयश्री गुरण्णावर, ऍड. अमर येळ्ळूरकर, प्रवीण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील, राज्य सेपेटरी के. जी. पाटील, दुर्गेश मेत्री, अमोल देसाई, शाम मंथेरो, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
चाबुक, नांगर आणि झाडू
शेतकऱयांवर अन्याय करत असाल तर चाबुक हाती घेवू, आम्हाला शेती करायला दिला नाही तर तुमच्यावर नांगर फिरवू, शेतकऱयांचा विश्वासघात कराल तर झाडू घेवून तुम्हालाही कचऱयासारखे गोळा करु, असा इशारा शेतकरी आणि महिलांनी सरकारला दिला आहे. जोपर्यंत शेतकरी शांत आहे तोपर्यंतच शांत. मात्र त्याच्या जीवावर येत असेल तर तुम्हाला निश्चितच हिसका दाखवू, असा इशाराच शेतकऱयांनी यावेळी दिला आहे.
शहरातील सर्व व्यवहार सुरळीत
शेतकऱयांनी पुकारलेल्या बंदला बेळगावात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सरकारी कार्यालये, बँका व इतर व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र काही प्रमाणात त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. विविध भागातील बसेस बंद होत्या. त्याचबरोबर शेतकऱयांनी पुकारलेल्या बंदमुळे बेळगावकडे येणाऱयांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे या बंदला सर्वत्र संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.