दुसऱयादिवशी महाराष्ट्रातून मोजक्मयाच बस बेळगावात दाखल, महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे धावताहेत बसेस, प्रवाशांना दिलासा मात्र प्रतिसाद अल्पच
बेळगाव : प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र बससेवेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. बेळगाव व चिकोडी विभाग वगळता कर्नाटकातील इतर आगारातून येणाऱया बसेसना महाराष्ट्रात प्रवेश नाकारला जात आहे. बुधवारी बेळगाव विभागातून महाराष्ट्राच्या मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी शहरांकडे 55 हून अधिक बसगाडय़ा धावल्या. मंगळवारी महाराष्ट्रातून बेळगाव आगाराकडे एकही बस धावली नव्हती. बुधवारी दुसऱयादिवशी बेळगाव बसस्थानकात महाराष्ट्राच्या लालपरीची एन्ट्री झाली असून कोल्हापूर जिल्हय़ातून या गाडय़ा बेळगाव स्थानकात दाखल झाल्या होत्या.
कर्नाटक परिवहन मंडळ व महाराष्ट एसटी महामंडळ या दोन परिवहन मंडळांनी चर्चा करून दोन्ही राज्यात बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या बसेस महाराष्ट्रात धावत असल्या तरी महाराष्ट्राच्या एकही लालपरीने बेळगाव विभागात एन्ट्री केली नव्हती. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महाराष्ट्राच्या सर्व जिल्हय़ांतून कर्नाटकात बसेस येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सीमेवरील कर्नाटक-महाराष्ट्र गावातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कर्नाटकात बसफेऱया वाढव्यात, अशी मागणी होत आहे. सध्या परिवहन मंडळाच्या मर्यादित बसेसना महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांत प्रवेश दिला जात आहे.
बेळगाव आगारातून महाराष्ट्रात धावणाऱया बसफेऱयातून 40 टक्के उत्पन्न मिळते लॉकडाऊनपूर्वी महाराष्ट्रात 350 हून बसेस धावत्या होत्या. त्यामुळे आगाराचे एकूण उत्पन्न दररोज 70 ते 80 लाख रुपये होते. कोरोनामुळे 22 मार्चपासून बेळगाव विभागातून होणारी बससेवा ठप्प झाली. आणि बेळगाव विभागाला याचा मोठा फटका बसला होता. कोरोना काळात 110 कोटीचा फटका बसला होता. मात्र अनलॉक 4 मध्ये कर्नाटक-महाराष्ट्र बससेवेला परवानगी दिल्याने पुन्हा उत्पन्नात वाढ होईल, पहिल्या दोन दिवसांत प्रवाशांचा म्हणावा, तितका प्रतिसाद मिळत नसला तरी येत्या काही दिवसात हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल, अशी आशा परिवहनला आहे.