बातमीदार / खानापूर
लाल-पिवळय़ा विरोधात सोमवार दि. 8 रोजी बेळगाव महापालिकेवर काढण्यात येणाऱया मोर्चामध्ये खानापूर तालुक्मयातील युवावर्ग मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. मोर्चा आणि युवकांमध्ये सीमाप्रश्नाबाबत जनजागृती करण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी युवा समितीचे माजी कार्याध्यक्ष धनंजय पाटील बोलताना म्हणाले, आज -काल मराठी भाषिकांना चारी बाजूने डिवचण्याचा प्रयत्न सुरू असून मराठी युवकांनी याबाबत संघटित होणे गरजेचे असून युवकांनी सीमाप्रश्न समजून घेत, याबाबत इतर युवकांत जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी युवकांना एकत्र करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
राजू पाटील यांनी समितीच्या कार्यात भाग घेण्यासह आपल्या भागातील रस्ते, पाणी, बससेवा व इतर समस्यांवर आवाज उठविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.
रणजित पाटील यांनी समितीच्या कार्यात युवकांचा सहभाग वाढला तर येणाऱया काळात समितीला बळकटी मिळेल, असे मत व्यक्त केले. यावेळी अर्जुन देसाई, विक्रम देसाई, सदानंद पाटील, किशोर हेब्बाळकर, वामन देसाई आदीनी मनोगत व्यक्त केले. यावेळी युवकांनी तालुक्मयामध्ये युवा समिती स्थापन करून विविध विषयांवर आवाज उठवावा, असे मत व्यक्त केले.
यावेळी विनायक सावंत, महेंद्र देसाई, राजन सुतार, सोमनाथ पाटील, प्रशांत पाटील, स्वागत पाटील, महादेव ऱहाटोळकर, सतीश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्या शिवस्मारक येथे बैठक
सोमवारच्या मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी रविवार दि. 7 रोजी दुपारी 3 वाजता शिवस्मारक (खानापूर) येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तालुक्मयातील कार्यकर्त्यानी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.