प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याची दुरवस्था झाल्याने मागील वषी रूंदीकरण व डांबरीकरण केले होते. मात्र यंदा रस्त्या शेजारी कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले असून, विजयनगर व सिंधी कॉलनी परिसरात रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गाचे डांबरीकरण करून संपूर्ण रस्ता चकाचक केला. पण सध्या हा रस्ता दुर्गंधी आणि कचऱयाच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्यावरून धावणाऱया वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्याची रूंदी वाढविली होती. मात्र रस्त्या शेजारी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याशेजारी गटारी नसल्याने विविध परिसरातील सांडपाणी मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. विजयनगर साई मंदिर समोर रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. याठिकाणी बसथांबा असून वाहनांच्या रहदारीमुळे प्रवाशांच्या अंगावर सांडपाणी उडत आहे. तसेच दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर सांडपाणी उडत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी पाणी साचून रस्त्यावरून वाहत असूनही, याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. वारंवार तक्रार करूनही महापालिकेच्या अधिकाऱयांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे याचा त्रास नागरिकांन सहन करावा लागत आहे. येथील समस्येचे निवारण तातडीने करावे अशी मागणी होत आहे.