के.आर. शेट्टी चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर. शेट्टी चषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब ए संघाने सीसीआय संघाचा 8 गडय़ांनी तर विजया क्रिकेट अकादमी संघाने एसकेई संघाचा 50 धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.
सोहम पाटील (बीएससी), साईराज साळुंखे (विजया) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
गुड शेफर्ड मैदानावर आयोजित शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सीसीआय संघाने 25 षटकात 9 बाद 135 धावा केल्या. त्यात शुभमने 40, झोयाने 21, श्रेयसने 20 धावा केल्या. जयशांतने 35 धावांत 3, श्लोकने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 21 षटकात 2 बाद 136 धावा करुन सामना 8 गडय़ांनी ज्ंिाकला. सोहम पाटीलने 68, आरुष पुत्रणने 43 धावा केल्या. सीसीआयतर्फे शुभम व स्वयम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात विजया क्रिकेट अकादमी संघाने 25 षटकात 2 बाद 167 धावा केल्या. त्यात साईराज साळुंखेने 77, नविनने 49 धावा केल्या. एसकेईतर्फे प्रथमेश व आदित्य यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसकेई संघाचा डाव 20.4 षटकात 117 धावात आटोपला. पार्थ केळूसकरने 32, प्रणवने 23 धावा केल्या. विजयातर्फे साईराज साळुंखेने 19 धावांत 4, ओमकारने 22 धावात 3, गौरवने 22 धावांत 2 गडी बाद केले.
आज अंतिम सामना : बेळगाव स्पोर्ट्स क्लब वि. विजया क्रिकेट अकादमी, दुपारी 12 वाजता.