डॉ. एस. पी. सुरेबानकर यांचे प्रतिपादन : आरपीडी कॉलेजमध्ये ‘क्रांतिदिन’ साजरा, प्रदर्शनात मांडली जिल्हय़ातील स्वातंत्र्यसैनिकांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
स्वराज्य, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण हे प्रमुख मुद्दे घेऊन लोकमान्य टिळक स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाले होते. टिळकांच्या विचारांचा बेळगावमध्ये मोठा प्रभाव होता. त्यामुळे ‘कर्नाटक सिंह’ म्हणून ओळख असणारे गंगाधरराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली टिळकांच्या विचारांनी एक फळी तयार झाली होती. पहिले स्वदेशी स्टोअर हे बेळगावच्या गणपत गल्ली येथे उघडण्यात आले. याचबरोबर गणेश राष्ट्रीय विद्यालय त्याकाळी सुरू करण्यात आले होते. टिळकांच्या हस्ते झेंडा चौक येथे पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रति÷ापना करण्यात आली होती. त्यामुळे टिळक जरी पुण्याचे असले तरी त्यांची बेळगाव ही कर्मभूमी ठरली, असे प्रतिपादन डॉ. एस. पी. सुरेबानकर यांनी केले.
राणी पार्वतीदेवी पदवीपूर्व कॉलेज आर्ट्स ऍण्ड कॉमर्स कॉलेजतर्फे मंगळवारी ‘क्रांती दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी ‘बेळगाव जिल्हय़ातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान’ या विषयावर प्रा. डॉ. एस. पी. सुरेबानकर बोलत होत्या. व्यासपीठावर स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार सुभाष कुलकर्णी, सोसायटीचे व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, आरपीडी कॉलेजच्या व्यवस्थापन कमिटीच्या सदस्या लता कित्तूर उपस्थित होत्या.
डॉ. सुरेबानकर म्हणाल्या, ‘कित्तूर राणी चन्नम्मा या ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱया पहिल्या महिला होत्या. संगोळ्ळी रायण्णा यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांविरुद्धचा लढा दिला. महात्मा गांधीजी एकूण 7 वेळा बेळगावमध्ये आले होते. स्वातंत्र्यलढय़ाला निधीची गरज होती. गांधीजींनी बेळगावमधील नागरिकांना निधी संकलन करण्याचे आवाहन केले आणि अवघ्या तासाभरात लोकांनी त्याकाळी 44 हजार रुपये जमा केले होते.’
स्वातंत्र्यसैनिक आर. एच. कुलकर्णी यांचे पुतणे सुभाष कुलकर्णी यांनी बेळगाव जिल्हय़ातील स्वातंत्र्य संग्रामाला उजाळा दिला. वृंदा पाटील हिच्या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. महादेव खोत यांनी स्वागत केले. क्रांती दिनाचे औचित्य साधून आरपीडी कॉलेजतर्फे बेळगाव जिल्हय़ातील स्वातंत्र्यसैनिकांची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. 16 ऑगस्टपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत रानडे हॉल येथे प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
बाबुराव ठाकुर यांच्यामुळे मिळाले ‘काँग्रेस रोड’ नाव
भारतीय स्वातंत्र्यलढय़ात बेळगावमधील नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. सुशिलाबाई कुलकर्णी यांनी दागिने विकून त्याचे पैसे लढय़ासाठी दिले. याळगी कुटुंबीय हे देशातील एकमेव कुटुंब असेल की ज्या कुटुंबातील सर्वांधिक लोक तुरुंगात होते. बाबुराव ठाकुर यांनी काँग्रेस अधिवेशनाचे कायम स्मरण क्हावे, यासाठी काँग्रेस रोडच्या नामकरणाची मागणी लावून धरली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ‘काँग्रेस रोड’ हे नामकरण झाले, अशी माहिती सुभाष कुलकर्णी यांनी दिली.