प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागामध्ये 1 जून 1986 रोजी कन्नडसक्ती लागू करण्यात आली. त्याविरोधात सीमाभागातून संतापाची लाट उसळली. आंदोलन करण्यात आले. त्यावेळी कर्नाटक पोलिसांनी गोळीबार केला. 1 जून रोजी हिंडलगा येथे मोहन पाटील, परशराम लाळगे आणि भरमाण्णा कदम हे हुतात्मा झाले. 6 जून रोजी झालेल्या गोळीबारात भावकू चव्हाण, मारुती गावडा, कल्लाप्पा उचगावकर तसेच जुने बेळगाव येथे शंकर खन्नुकर व हिंदवाडी येथे विद्या शिंदोळकर आणि नागाप्पा होसूरकर हे हुतात्मा झाले. त्यांना रविवारी बेळगुंदी येथे सकाळी 8 वाजता प्रातिनिधिक स्वरुपात अभिवादन करण्यात येणार आहे.
कोरोनाचे संकट असल्यामुळे गांभीर्य ओळखून कार्यकर्त्यांनी आपल्या गावातूनच अभिवादन करावे. बेळगुंदी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोजक्मयाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे अभिवादन करण्यात येणार असल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे. या हुतात्म्यांचे स्मरण करून बलिदान वाया जाऊ न देता भविष्य काळात संघटित राहण्याची शपथ घेऊन हुतात्म्यांना अभिवादन करूया, असे आवाहन तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे, उपाध्यक्ष सुरेश डुकरे, पौर्णिमा पाटील, पिराजी मुचंडीकर, अशोक पाटील, शट्टूप्पा चव्हाण व इतर पदाधिकाऱयांनी केले आहे.