डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवक मंडळाच्यावतीने ग्राम पंचायतीला दिले निवेदन
वार्ताहर /किणये
बेळवट्टी येथील आंबेडकर गल्लीतील रस्ते, गटारी व पाणी समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवक मंडळाच्यावतीने मंगळवारी ग्राम पंचायतीला निवेदन दिले आहे.
आंबेडकर गल्लीतील गटारींची समस्या अधिक वाढली आहे. गेल्या 20 वर्षांपासून गटारीच बांधल्या नाहीत. याकडे ग्राम पंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. आंबेडकर भवनाच्या सभोवती कंपाऊंड बांधण्यात यावे, गल्लीतील रस्त्यांचे काम अर्धवट आहे. गल्लीसाठी नळांचे कनेक्शन देण्यात यावे, अशा मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता न केल्यास ग्रा. पं. ला टाळे ठोकण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पीडीओ एच. एन. नाईक यांच्याकडे निवेदन देताना आंबेडकर युवक मंडळासह सावित्रीबाई फुले मंडळाचे सदस्य व सदस्या उपस्थित होत्या.