प्रतिनिधी /म्हापसा
सलग सहा दिवस पाणी पुरवठा झाला नसल्याने वेरे नेरूल, रेईसमागूस भागात भेडसावणाऱया पाणी समस्यावर तोडगा काढण्यासाठी पणजी येथील मुख्य सचिवांच्या कार्यालयात खास बैठक साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली होऊन या बैठकीत या भागात भेडसावणाऱया पाणी समस्यावर कायमचा तोडगा काढावा असे आवाहन आमदार जयेश साळगावकर यांनी केले. या दोन दिवसात या भागातील सर्व पाईपलाईन तपासून येथील पाणी समस्या आम्ही सोडवू असे ठोस आश्वासन यावेळी अभियंता वर्गांनी आमदारांना दिले व अखेर सातव्या दिवशी गुरुवारी या भागात आमदारांनी आवाज वठविल्यावर पाणी सोडण्यात आले.
या बैठकीला आमदार जयेश साळगावकर यांच्यासमवेत वेरे पंच शैलेंद्र परुळेकर, गौरीश पेडणेकर, नेरूलचे रामा बाणावलीकर, मुख्य अभियंता संतोष म्हापणे, कार्यकारी अभियंता शंभू मालवणकर, एई देवेश खन्ना, कनिष्ठ अभियंता अमय लवंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या भागातील वॉल्व कुठे फुटलेले आहेत ती सर्व लाईन तपासणी करण्याचा आदेश यावेळी मुख्य सचिवांनी दिला. या भागात जे बोअर व्हेल आहेत त्यांची तपासणी करून पाणी फ्लेश करावे व त्या पाण्याता वापर पिण्यासाठी करावा असे ठरविण्यात आले. इतर मतदारसंघ वगळता फक्त या भागातच पाणी पुरवठा का होत नाही या प्रश्नावर आमदारांनी जोर धरला. लाईनमेन वॉल्व सोडणारे इसम हे कारण एकमेकावर झाडतात हेही आमदारांनी नदिर्शनास आणून दिले. अस्नोडा पाणी प्रकल्पात काही तांत्रिक बिघाड झाल्याने या भागातील पाणी पुरवठा होत नसल्याचे बैठकीत अभियंता वर्गांनी सांगितले असता हे कारण आपण नागरिकांना सांगू शकत नाही. असे आमदारांनी त्यांना सांगितले. आपल्यास येथील पाणी पुरवठा सुरळीत व्हायला पाहिजे या मागणीवर त्यांनी जोर धरला. नंतर सर्व अभियंता वर्ग अस्नोडा पाणी प्रकल्पावर गेले व पाहणी केली. 24 तासाच्या आत येथे पाणी सुरळीत करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आली. दरम्यान जयेश साळगावकर यांनी गुरुवारी बैठकीनंतर पाणी या भागात सोडल्यामुळे आभार व्यक्त केले. आम्हाला किमान 3 तास तरी पाणी कायमस्वरुपी द्या अशी मागणी आमदारांनी केली आहे.