कित्येक भारतीय व परदेशी जनतेसाठी भारतीय सिनेमाची व्याख्या ही ‘बॉलीवूड’ सिनेसृष्टीपर्यंतच मर्यादित आहे. भारतात 29 राज्यांमध्ये मिळून 22 भाषा बोलल्या जातात आणि त्यातही नवल असे आहे की राज्यातील विविध भूभागाप्रमाणे त्याच भाषेच्या विविध बोली आपल्याला ऐकायला मिळतात. भारत हा एकच देश असा आहे जो ‘विविधतेमध्ये एकता’ ही परंपरा खूप पूर्वीपासून पाळत आला आहे. हिंदी जरी देशाची राष्ट्रभाषा असली तरी या 22 भाषा स्वतंत्ररित्या अद्वितीय आहेत. उत्तरेकडे पंजाबी सिनेसृष्टी तर ईशान्येकडे असलेल्या ‘सात बहिणी’ राज्यांकडे त्यांची स्वतंत्र सिनेसृष्टी आहे. पश्चिमेतील महाराष्ट्रात बॉलीवूडसह मराठी सिनेनाटय़सृष्टीचे देखील मूळ आहे. माणूस आता चंद्रावरच नाही तर मंगलवरही पोचायची वेळ आली, तरी दक्षिणेकडील आपल्या भावा-बहिणींना आपण ‘मद्रासी’ असे नाव देऊन मोकळे होतो. दक्षिणेतदेखील तेलगू, तामिळ, मल्याळम, तुळू आणि कानडी अशा 5 स्वतंत्र भाषेत सिनेमा बनतात. प्रत्येकाची वैशि÷य़ेही आगल वेगल आहेत. भारताकडे एवढा भरमसाठ इतिहासाचा आणि कलेचा साठा असूनही आजही आपण पूर्वग्रहदूषित मनामुळे, आंतरभाषीय सिनेमांकडे दुर्लक्ष करून बॉलीवूडला सर्वश्रे÷ घोषित केले आहे.
कित्येक प्रेक्षकांना हेही माहीत नसेल की भारतातील पहिला सिनेमा हा बॉलीवूडमध्ये निर्माण झाला नसून 1913 साली दादासाहेब फाळके नावाच्या एका मराठी माणसाने काढला होता. दादासाहेब हे ‘पडद्यावरील हलत्या चित्रांवर’ खूप प्रभावित होते आणि या अफाट कलेमुळे भारतातील विविध कलांना एक नवीन व्यासपीठ मिलवे म्हणून समाजाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी देशाला सिनेमाचा परिचय करून दिला. एकेकाल इतक्या सरळ भावनेने सुरू झालेली सिनेसृष्टी आज शोषणाचे एक माध्यम बनून राहिली आहे.
पूर्वी ‘कथा म्हणजेच राजा’ हे बोधवाक्मय धरून बनवले जाणारे सिनेमे आज फक्त ग्लॅमरभोवती फिरतात. कथेला प्राधान्य न देता, केवळ अवास्तव वैभव दाखवून प खsक्षकांना मोहित करणारे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट होतात आणि विचारपूर्वक कथाकथन करणाऱया सिनेमांकडे दुर्लक्ष केले जाते. सिनेमा ही कला आहे हे विसरून माणूस त्यातील पात्र व कलाकारांना सर्वश्रे÷ मानू लागला आहे. कलाकारांच्या बेताल जीवनशैलीला परिपूर्ण आयुष्याचे प्रतिनिधित्व मानून माणूस वास्तविक आयुष्याला अकार्यक्षम समजू लागला आहे. जोपर्यंत एका सिनेमात भव्य सेट, अंग प्रदर्शन करणारे अभिनेता अभिनेत्री आणि अतिरंजित लढाई, मारामारी बघायला मिळत नाहीत, तोपर्यंत तो सिनेमा उदात्त मानला जात नाही. मग प्रश्न असा पडतो की अमर्याद मादक पदार्थांचा वापर, मद्यपान आणि अंगप्रदर्शना शिवाय चांगले कथाकथन होऊ शकत नाही का?
अगदी निर्विवाद होऊ शकते. कित्येक प्रादेशिक चित्रपट आहेत ज्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे की अजूनही काही चित्रपट निर्माते ‘कथा म्हणजे राजा’ ही परंपरा पुढे चालवत आहेत. अकादमी पुरस्कार, ज्यांना ‘ऑस्कर्स’ असे म्हटले आहे, तो जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार मानला गेला आहे. 2021 मध्ये आयोजित केल्या जाणाऱया ऑस्कर्स पुरस्कार सोहळय़ात भारतदेखील भाग घेणार आहे. आणि ऑस्कर्समध्ये हा प्रवेश 2019 मधील ‘जल्लीकट्टू’ नावाच्या एका मल्याळम सिनेमाने मिळवला आहे. जल्लीकट्टू हा तामिळनाडूतील एक पारंपरिक खेळ/कार्यक्रम आहे ज्यामध्ये सहभागी एक बलवान बैलावर मात करायचा संघर्ष करतो. ‘जल्लीकट्टू’ या सिनेमाची कथा एका दुर्गम गावात घडते. कथेचा पाया फक्त एवढाच आहे की एक बैल एका कत्तलखान्यातून पळतो आणि थैमान घालतो. गावकऱयांचा त्या बैलावर ताबा मिळवण्याचा अनुभवावर तो सिनेमा आधारित आहे. एवढी सोपी गोष्ट असूनही एवढय़ा भव्य पुरस्कारात या सिनेमाची निवड कशी झाली हे नक्कीच विचार करण्यासारखे आहे.
यापूर्वी कित्येक सिनेमांना ‘ऑस्कर्स’मध्ये भाग घ्यायची संधी मिलली आणि त्यातले गांधी (1983) आणि ‘स्लमडॉग मिलिऑनर’ (2009) हे चित्रपट विजेते ठरले होते. 2004 मध्ये प्रकाशित झालेला मराठी सिनेमा ‘श्वास’ देखील ‘ऑस्कर’मध्ये भाग घेऊ बघत होता पण आर्थिक अडचणीमुळे निर्माते आवश्यक जाहिरात करू शकले नाहीत. त्यावेळेला कित्येक सामान्य जनता तसेच अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गजांनी चित्रपट निर्मात्यांना आर्थिक मदत दिली. पण ‘श्वास’ हा सिनेमा पुरस्काराला पात्र असूनही जिंकू शकला नाही.
कोणतीही कला ही त्या राज्याचा धनसंग्रह आहे कारण मालमत्ता ही कधीही स्थिर नसते पण पूर्वापार चालत आलेली संस्कृती, कला आणि वंश ही माणसाची खरी ओळख असते. या सगळय़ाचा अर्थ असा होतो का की बॉलीवूड सिनेमा हा अकार्यक्षम आहे, तर अजिबात नाही. बॉलीवूडसुद्धा एक खूप मोठा वारसा पुढे चालवत आहे ज्याचा प्रभाव आपल्याला सर्वत्र दिसत आहेच. पण भारतीय सिनेमाला बॉलीवूडची ओळख देऊन निष्कर्ष काढणेदेखील चुकीचे आहे. राष्ट्रीय प्रतिज्ञेमध्ये आपण ‘भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बंधू-भगिनी आहेत’ ही शिकवण पुन्हा एकदा नव्याने लोकांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे. भाषा आणि संस्कृतीने जरी आपण भिन्न असलो तरी राष्ट्रप्रेमाने आपण एकमेकांना समजून घेऊन समाधानाने राहू शकतो. एकमेकांच्या कलेचा आदर करणे, उदयोन्मुख प्रतिभेला प्रोत्साहन देणे या गोष्टी जरी आपण केल्या तरी भारतात दडलेल्या भरभक्कम प्रतिभेला आपली कला प्रदर्शित करायचा आत्मविश्वास मिळेल. भाषेच्या भेदामुळे, एखाद्या कलेच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करणे हे खरेतर विध्वंसकच आहे. कोणताही सिनेमा हा त्याच्या सर्जनशीलतेकडे बघून जर आपण बघितला तर माणसाच्या आर्थिक क्षमतेपेक्षा बौद्धिक क्षमतेची ताकत किती श्रे÷ आहे हे आपल्याला अनुभवायला मिळेल. पैसा हा माणसाला जगायला मदत करतो, तर कला आणि भावना माणसाला जगण्याची खरी उमेद देतात. ‘जल्लीकट्टू’ ला पुढील पर्वासाठी खूप शुभेच्छा व हीच आशा करुया की असेच अद्वितीय चित्रपट भारतीय सिनेसृष्टीला एक नवीन ओळख देतील.
श्राव्या माधव कुलकर्णी