योग्य नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनः रयत संघटनेचा निवेदनाद्वारे इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
बोगस सोयाबीन बियांणामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱयांना फटका बसला आहे. तेव्हा त्यांना नुकसान भरपाई द्यावी. याचबरोबर मागील वषी आलेल्या महापुरामुळे जी घरे पडली त्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे पडक्मया घरातच राहात आहेत. यावषीच्या पावसाळय़ामध्ये ही घरे पडण्याची शक्यता आहे. यामध्ये जीवितहानी झाली तर त्याला सरकार जबाबदार असेल. तरी शेतकऱयांना तातडीने योग्य ती आर्थिक मदत करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
खरीप हंगामाच्या पेरणीसाठी जिल्हा कृषी विभागाने शेतकऱयांना बि-बियांणे उपलब्ध केली. मात्र ही खराब निघाल्यामुळे त्याची उगवण झाली नाही. सोयाबीन बियाणे तर पूर्ण खराब निघाली आहेत. त्यामुळे शेतकऱयांना फटका बसला आहे. तेव्हा संबंधित शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
जाहीर रक्कम त्वरित देण्याची मागणी
मागील वषी झालेल्या दमदार पावसामुळे जिह्यातील विविध गावांना महापुराचा मोठा फटका बसला. त्यामध्ये अनेक घरे कोसळली. मात्र त्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. अनेकांवर अन्याय झाला आहे. तेव्हा संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. आता अनेक घरे अर्धवट स्थितीत आहेत. सरकारने रक्कम जाहीर केली. मात्र ती दिली नाही. तेव्हा त्याचा सर्व्हे करुन योग्य व्यक्तींना पूर्ण नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भीमसी गडादी, गणेश इळगेर, मल्लिकार्जुन रामदुर्ग, रवी सिध्दम्मण्णावर, उजेंद्र गाणगेर, सिध्दलिंग पुजारी, सी. ओ. कुलकर्णी, राजू मरवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.