ऑनलाईन टीम / गया :
आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेल्या बोधगया मधील हॉटेल संचालकांनी चीनी पर्यटकांना आपल्या हॉटेलमध्ये राहण्यास बंदी घातली आहे.
या संदर्भात माहिती देताना हॉटेल असोसिएशनचे महासचिव सुदामा कुमार यांनी सांगितले की, ‘हिंदी-चीनी भाई – भाई’ अशी घोषणबाजी करत चीनने भारताला कायम धोका दिला आहे.
यावेळी चीनने गलवान खोऱ्यात जो भ्याड हल्ला केला तो माफ करण्याजोगा नाही. या हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी म्हणून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये चीनी पर्यटकांना राहण्यास बंदी घालत आहोत, तसेच चीनी उत्पादनांवर देखील बहिष्कार घालत आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.