42 जणांची माघार : निवडणूक होणार तिरंगी
वार्ताहर/ बोरगाव
27 डिसेंबरला होणाऱया बोरगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 42 जणांनी माघार घेतली. त्यामुळे एकूण 17 जागांसाठी 50 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱयांनी दिली.
17 प्रभांगासाठी उत्तम पाटील गटाच्या नगर विकास पॅनेलमधून 17 उमेदवार, तर माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले गटाच्या परिवर्तन पॅनलमधून 17 उमेदवार तसेच भाजप गटातून 16 उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यामुळे तिरंगी होणारी ही निवडणूक सर्वांनाच प्रति÷sची बनली आहे.
उमेदवार पुढीलप्रमाणे…
उत्तम पाटील गटाकडून प्रभाग क्रमांक एक मधून अनुक्रमे सुरेखा महावीर घाळे, भारती बाळू वसवाडे, सुवर्णा बाहुबली शोबाने, वर्षा शिवाजी मनोगुत्ते, जावेद कमृद्दिन मकानदार, पिंटू तुकाराम कांबळे, प्रदीप शंकर माळी, रोहित शामराव माने पाटील, संगीता अमर शिंगे, दिगंबर दिलीप कांबळे, अभयकुमार भूपाल मगदूम, तुळशीदास सिद्धू वसवाडे, अश्विनी संजय पवार, माणिक दत्तात्रय कुंभार, गिरिजा उत्तम वठारे, शोभा पोपट हवले, रुकसाना बाळासाहेब अपराज तर परिवर्तन पॅनल अण्णासाहेब हावले गटाकडून शरद बाळासाहेब जंगटे, शाराबाई सिद्राम गावडे, पुष्पा बंडू हवले, सुशिला सदाशिव दबडे, इरफान दिलावर मकानदार, संजय वसंत कोरवी, आण्णासाहेब तिप्पा बारवाडे, संजय बाळू हवले, सरिता पुंडलिक थोरात, विजयकुमार शिवराम शिंगे, भरत बंडू हवले, रावसाहेब अन्नू वसवाडे, त्रिशला शितल पाटील, दादासाहेब अन्नू हवले, शांता कृष्णा कोटरे, विद्याधर शांतीनाथ कमते, आस्मा इमाम भुरके हे उमेदवार उभे आहेत.
तसेच भाजपकडून जमील गुलाब अत्तार, सुशीला महादेव ऐदमाळे, वर्षा शितल हवले, अलका अण्णासाहेब पाटील, इलाई शमशुद्दीन अपराज, शिवाजी धोंडीराम भोरे, जयश्री प्रकाश पाटील, अजित भोपाल तेरदाळे, राणी पिंटू बेवीनकट्टी, बाबासाब पांडुरंग चौगुले, रमेश सिदागोंडा पाटील, दिपाली राहुल कुंभार, सोनाली विष्णू तोडकर, दादासो महादेव भादुले, रमेश विलास वसवाडे, सुरेखा महादेव माळी हे उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक अधिकाऱयांकडून चिन्हांचे वाटपदेखील करण्यात आले .यामध्ये भाजपला कमळ, नगर विकास पॅनेलला शिट्टी व परिवर्तन पॅनेलला कपबशी चिन्ह देण्यात आले.
काँग्रेसकडून एकही उमेदवार रिंगणात नाही
निपाणी विधानसभा मतदारसंघात बोरगाव हे गाव काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाते. अशा या गावात भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र अपक्ष दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक न लढविता दोघांनीही स्वबळावर निवडणूक लढवण्याची पसंती केली आहे. परिणामी काँग्रेसकडून एकही उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून, पुढील काळात काँग्रेस पक्षाची माळ कोणाच्या गळय़ात पडणार हे समयच ठरवणार आहे.