प्रतिनिधी / सातारा
वाई तालुक्यातील बोरगाव येथे धोम-बलकवडी धरणाची उजव्या कालव्याची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाई तालुक्यातील धोम धरणाच्या परिसरात बोरगाव हे गाव आहे. या गावाच्या लगतच धोम-बलकवडी धरणाची उजव्या कालव्याची पाईपलाईन जाते. ती पाईप लाईन आज दुपारी फुटली अन् लाखो लिटर पाणी शेतांमध्ये घुसले. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. स्ट्रॉबेरीचे संपूर्ण प्लॕट पुर्ण वाहून गेले. हाता तोंडाला आलेली पीक वाहून गेली. अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.