ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय लष्कराने ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या जमिनीवरून हल्ल्याची अंदमान आणि निकोबार बेटांवरून यशस्वी चाचणी घेतली.
वृत्तसंस्थेच्या ट्विटनुसार, भारताने आज सकाळी 10 वाजता अंदमान आणि निकोबार बेटांवर ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या जमिनीवरून हल्ला करणाऱ्या चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने आपले लक्ष अचूक गाठले.
ब्रह्मोस हे मिसाईल डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओएमने संयुक्तरित्या बनवले आहे. हे जगातील सर्वात वेगवान मिसाईल आहे. पाणडुबी, जमीन, लढाऊ विमानातून हे मिसाईल डागले जाऊ शकते. या मिसाईलची स्ट्राइक रेंज आता 400 किलोमीटरहून अधिक वाढवण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन आणि पाकिस्तानबरोबर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सतत तणाव असताना भारत या आठवड्यात ब्रह्मोसच्या आणखी काही चाचण्या घेणार आहे.