पोलीस दलाकडून लाखांच्या वर केसेस
प्रतिनिधी/ सातारा
मार्चपासून सुरु झालेली दुसरी लाट रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन व त्यानंतर केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्हय़ातील लोकांनी नियम पाळण्यापेक्षा दंड भरणे अधिक पसंद केल्याचे दिसून येत आहे. कारण मार्च ते मे या कालावधीत लॉकडाऊनचे नियम मोडणाऱयांवर कारवाई करत पोलीस दलाने तब्बल 1 लाख 13 हजार 601 एवढय़ा केसेस केलेल्या आहेत. तरा या कारवाईमध्ये पोलीस दलाने तब्बल 3 कोटी 10, लाख 1 हजार 900 एवढा दंड वसुल केल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी दिलीय.
दि. 3 मार्च पासून ब्रेक द चेन व त्यानंतर लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर पोलीस दलाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर एकूण 30 हजार 109 केसेस करुन 81,47,600 दंड वसुल करण्यात आलेला आहे.
तर मोटार वाहन कायदयाप्रमाणे 79 हजार 529 केसेस करुन 1, कोटी 92 लाख 3 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. दि. 14 मे पासून विनाकारण फिरणारे व ई पास चे उल्लंघन करणाऱया नागरीकांवर 2 हजार 959 केसेस व 19 लाख 20 हजार 800 दंड वसुल करण्यात आलेला आहे.
लग्न समारंभासाठी मंगल कार्यालयात जमवल्याप्रकरणी पोलिसांनी 25 केसेस केलेल्या त्यापोटी लग्न मालक व मंगल कार्यालयाकडून 1 लाख 94 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. दुकाने, शॉपींग मॉल यांनी लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केले बद्दल 902 केसेस 8 लाख 6 हजार 100 दंड वसुल केला आहे. खाजगी प्रवासी वाहतुक व लक्झरी बसेस यांनी विनापास प्रवासी घेतले बद्दल व इतर नियमांचा भंग केले वरुन 77 केसेस 7,30,000/- दंड वसुल केलेला आहे.
4 हजाग 648 दुचाकी, कार जप्त
लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करुन विनाकारण फिरणारांचे वाहन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 4409 दुचाकी व 239 चारचाकी वाहने जप्त / ताब्यात घेण्यात आलेली आहेत. याचबरोबर होमकॉरंन्टाईन नियम न पाळणे, वाहन निर्धारीत पेक्षा जास्त प्रवासी वाहतुक, सार्वजनिक ठिकाणी थुंकने, दुकानामध्ये सामाजिक अंतर न पाळणे सोशल डिस्टींग न पाळणे दारु तंबाखू चे सार्वजनिक ठिकाणी सेवन करणे अशा व वर नमुद कारवाई मध्ये कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेच्या काळात एकूण 1 लाख 13 हजार 601 केसेस व 3 कोटी 10 लाख 1 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कडक लॉकडाऊनमध्ये पोलीस दल अर्लट
जिल्हयातील प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर सर्वाधिक कोविड बाधित असलेली (टॉप टेन) गावे व सर्वात कमी कोविड बाधित असलेल्या (बॉटम टेन) गावांवर विशेष लक्ष ठेवून विशेष उपायोजना राबविण्यात येत आहेत. जास्त कोविड बाधित असणारे गावातील रुग्ण संख्या कमी होईल व कमी रुग्ण संख्या असेलेल्या गावांत रुग्ण संख्या वाढणार नाही या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येत आहेत. स्थानिक प्रशासनासोबत गांव पातळीवर सरंपच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचे सहकार्याने बॅरेकेटींग सह इतर उपाययोजना करण्यात येत आहेत.