मालवण / प्रतिनिधी-
मालवण कोळंब येथील भक्ती कॅश्यु फॅक्टरीचे मालक विजय उर्फ बाबू एकनाथ चव्हाण (५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कोळंब गावात चायनीज सेंटर आणि हाॅटेल व्यवसायही चव्हाण यांनी सुरू केला होता. काजू फॅक्टरीच्या निमित्ताने त्यांनी अनेक हातांना काम दिले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.