बेळगाव : मोठय़ांचे अनुकरण करत, लहान वयातच मुले वाईट मार्गावर जात आहेत व व्यसनाधीन बनत आहेत. तसेच अनेक मुले मोबाईलचा मोठय़ा प्रमाणात वापर करत असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होत आहेत. यामुळे भक्त प्रल्हाद संस्कार केंद्र लहान मुलांमध्ये अध्यात्म निर्माण व्हावे व त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे यासाठी अध्यात्माच्या मार्गाने पुढे सरसावले आहे.
भक्त प्रल्हाद केंद्राच्यावतीने गिरीवर दास हे वडगाव येथील विष्णू गल्ली विष्णू मंदिरात दर शनिवारी लहान मुलांकरिता कृष्ण कथा, कीर्तन, तुळशीप्रदक्षिणा, भगवतगीता पठण, पूजा यासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सायंकाळी 7 ते 9 या वेळेत करतात.
या कार्यक्रमाला इस्कॉनचे मार्गदर्शन लाभत असून पालकही मुलांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी मुलांना याठिकाणी पाठवत आहेत. तसेच दर शनिवारी याठिकाणी 110 मुला-मुलींसह वयोवृद्धही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवित आहेत.