प्रतिनिधी/ रत्नागिरी
निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडलेले परदेशी जहाज भगवती बंदर येथून भरकटून मिऱया किनाऱयावर अडकून पडले. या जहाजावरील पॅप्टनसह तेरा जणांना किनाऱयावर सुखरुप आणण्यात आले आहे. समुद्र खवळलेला असल्यामुळे तसेच जहाज आपटून त्याला छिद्र पडल्याने किमान महिनाभर तरी ते बाहेर काढणे अशक्य आहे.
मंगळवारी रात्रीपासून निर्सग चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू लागला होता. भगवती बंदर येथील नर्मदा सिमेंट जेटीवर हे डिझेलवाहू जहाज उभे होते. पहाटेला ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे व खवळलेल्या समुद्राच्या अजस्त्र लाटांमुळे जहाजाला अँकर तुटला. त्यामुळे हे जहाज भरकटू लागले. जवळच असलेल्या दुसऱया जहाजाच्या साह्याने मिरकरवाडा बंदरात भरकटलेले जहाज आणण्ययासाठी प्रयत्न सुरु होते, मात्र त्यात अपयश आले. हेलकावे खात ते जहाज हळूहळू भाटीमिऱयाच्या दिशेने जाऊ लागले. जहाजाच्या एका इंजिनमध्येही बिघाड झाल्याने ते सावरणे अशक्य झाले. जहाज बुडू नये यासाठी पॅप्टनचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अखेर दुपारच्या सुमारास भरकटेले हे जहाज मिऱया बंधाऱयाला लागले.
लाटांबरोबर हेलकावे खाणारे जहाज दगडी बंधाऱयावर आपटत होते. त्यामुळे त्याला छिद्र पडले आहे. त्यामुळे त्यातील डिझेलची गळती होऊन ते समुद्रात पसरले आहे. त्यामुळे जहाजावरील डिझेल काढणे आवश्यक बनले आहे. त्या जहाजापर्यंत दुसरे जहाज जाणे अशक्य असल्यामुळे किमान महिनाभर तरी हे जहाज तेथेच राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जहाजावर असलेल्या कॅप्टनसह तेरा खलाशांना बाहेर काढण्यात यश आले. मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले यांनी सर्व विभागांशी, कंपनीशी संवाद साधून या खलाशांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणा राबविली. यामध्ये 10 भारतीय, 1 श्रीलंकेती आणि उर्वरीत दोघे अन्य देशातील आहेत. हे जहाज परेशातून आले असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर त्या तेरा जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करुन ठेवण्यात येणार आहे. त्यांचे स्वॅबचे रिपोर्ट आल्यानंतरच त्यांना सोडण्यात येणार आहे.
‘श्रीजॉय’च्या आठवणी ताज्या
काही वर्षांपुर्वी मिऱयाबंदरजवळ अशाच प्रकारे ‘श्रीजॉय’ नावाचे जहाज अडकून पडले होते. आज त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने ‘श्रीजॉय’च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. हे जहाज पाहण्यासाठी बुधवारी मुसळधार पावसातही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
स्थानिक इंजिनिअर तरूणाचे सहकार्य
जहाज भरकटल्याची माहिती मिळताच स्थानिक इंजिनियर आदित्य सावंत यांनी आपण मदतीसाठी तयार असल्याचे मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक महेश सामंत यांना सांगितले. त्यानंतर महेश सामंत यांनी मेरीटाईम बोर्डाला याची माहिती दिली. आदित्य सावंत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांचे या कामी मोठे सहकार्य लाभले.
अंजनवेलमध्ये दोन बोटींना जीवदान
गुहागरः बुधवारच्या चक्रीवादळाने अंजनलेल समुद्रकिनारी नांगरून ठेवलेल्या दोन बोटीचे नांगर तुटल्याने दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या समुद्रात भरकटल्या होत्या. या दोन्ही बोटी असगोली येथील असून त्यावर प्रत्येकी 1 व्यक्ती होती. स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी अन्य बोटींच्या साहाय्याने या बोटींवर प्रवेश केला. इंजीन चालू करून त्या वेलदूर दाभोळ खाडीत सुरक्षीत नेण्यात आल्या.