प्रतिनिधी / पर्वरी
पर्वरीत भटक्मया कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. चौका चौकात हे भटके कुत्रे फिरत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या टोळय़ाही तयार झाल्या असून त्याचा त्रास पर्वरी रहिवाशांना होत आहे. रात्री अपरात्री त्यांच्या भुंकण्याने व केकाटण्यने अनेकांना झोपमोड सहन करावी लागत आहे.
पर्वरी येथील पुंडलिक नगर वसाहत, क्रांती नगर, एकता नगर, हौसिंग बोर्ड ते पोलिस वसाहती पर्यंत भटक्मया कुत्र्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. पर्वरीतील नागरीक नोकरी निमित्त विविध पाळय़ांमध्ये काम करत असतात. रात्र पाळिचे काम करून परतणार्या नागरिकांच्या अंगावर हे कुत्रे जात असून, हातात काठी घेऊन ह्या नागरिकांना घरी परतावे लागत आहे..
हे कुत्रे दिवसा ढवळय़ा लहान मुलांच्या अंगावर धावून आल्याच्या घटनाही घडल्या आहेत.. पंचायतीने ह्या भटक्मया कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून होते आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण, रॅबिज लसीकरण ई. होणे अत्यंत आवश्यक आहे.
दरम्यान पर्वरीतील वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे चौकातील कचरा वाढतो आहे. त्यामुळे कुत्र्यांना आयते खायला मिळत आहे.