कोरोना उदेकाच्या या आव्हानात्मक काळात अनेक शहरांमध्ये भटक्मया कुत्र्यांचेही हाल होत आहेत. खाणे-पिणे विकणाऱया गाडय़ा बंद असल्याने कुत्र्यांनाही अन्न पुरेसे मिळेनासे झाले आहे. अशा कुत्र्यांनाही अन्नसुरक्षा पुरवावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने कुत्र्यांनाही पोट भरण्याचा अधिकार असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. ज्या नागरिकांना अशा भटक्मया कुत्र्यांना अन्न द्यावयाचे असेल त्यांना आडकाठी करता येणार नाही, असा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे मुक्मया प्राण्यांबद्दल दयाबुद्धी असणाऱयांची सोय झाली आहे.
भटके कुत्रे किंवा तत्सम प्राणी बोलू शकत नाहीत. आपल्या अडचणी आणि आवश्यकता सांगू शकत नाहीत. पण त्यांच्याप्रमाणे आम्ही मुके नाही. त्यांच्या अधिकाराची चिंता आम्हाला करावी लागेल. माणसांप्रमाणेच त्यांनाही जगण्याचा आणि जगण्यासाठी अन्न मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा मुक्मया प्राण्यांना अन्नदान करणाऱया लोकांची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. इतर लोक अशा अन्नदात्यांना विरोध करत असतील तर त्यांना प्रशासनाने अडविले पाहिजे. मुक्मया प्राण्यांची अन्नसुरक्षाही सुनिश्चित झाली पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.