बेळगाव / प्रतिनिधी
कोरोना सुरू झाल्यापासून पोलीस, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या आणि परिचारिका, पाणी पुरवठा मंडळाचे व्हॉल्व्हमन आपली सेवा चोख बजावत आहेत. यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भवानीनगर सोशल क्लबतर्फे नुकताच सत्कार कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक पंढरी परब, अनंत देशपांडे, उद्योजक प्रकाश बोराना, हॉटेल व्यावसायिक संजय भातकांडे, सामाजिक कार्यकर्ते बापू भडांगे, चंद्रकांत पाटील, विश्वनाथ सव्वाशेरी उपस्थित होते. प्रमुख वक्त्या म्हणून तरुण भारतच्या पत्रकार मनीषा सुभेदार उपस्थित होत्या.
प्रारंभी श्रेया सव्वाशेरी हिने कोरोनासंदर्भात सुरू करण्यात येणाऱया जागृतीबद्दल माहिती देऊन गीत सादर केले. क्लबचे अध्यक्ष अरुण मालवणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या परिचारिका राजश्री नरगुंद, आशा कार्यकर्त्या शोभा जाधव, सुनीता मरगाळे यांचा मनीषा सुभेदार यांच्या हस्ते साडी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस विभागात संतोष पाटील यांचा तसेच कार्यकर्ते नरू निलजकर यांचा सत्कार अनंत देशपांडे व पंढरी परब यांनी केला. उदय चौगुले, परशराम चिकोर्डे व नागेश कलपत्री या व्हॉल्क्हमनचा सत्कार विश्वनाथ सव्वाशेरी व बापू भडांगे यांनी केला. संजय भातकांडे यांच्या हस्ते पथदीपांची देखभाल करणारे लोकेश राठोड व होम क्वारंटाईनची देखभाल करणारे नारायण डोंगरे व मार्शल यांचा सत्कार पंढरी परब व अनंत देशपांडे यांनी केला.
याप्रसंगी बोलताना पंढरी परब म्हणाले, कोरोना येईल आणि जाईल. परंतु माणुसकी टिकली पाहिजे. त्यादृष्टीने सदर क्लबने राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कोरोना काळात काही घटकांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. त्यांची नेंद घेणे आवश्यक ठरते.
मनीषा सुभेदार यांनी कोरोना काळात वेगळय़ा पद्धतीची पत्रकारिता करण्याचे आव्हान होते, असे सांगून या काळातील काही अनुभव कथन केले. खऱया अर्थाने मदत पोहोचविणाऱयांनी कोठेही गवगवा केला नाही. कोरोना झाला म्हणजे गुन्हा समजून बहिष्कृत करण्याचे प्रकारही समोर आले. डॉक्टर, पोलीस, पत्रकार, आरोग्य सेवक हे सर्वजण कोरोनाच्या प्रारंभापासून अथक परिश्रम घेत आहेत, असे त्या म्हणाल्या.
सत्कारमूर्तींतर्फे राजश्री नरगुंद यांनी समाजाने आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहन केले. क्लबचे अध्यक्ष अरुण मालवणकर यांनी सूत्रसंचालन केले. विनायक, प्रशांत, अमित पाटील, सागर तंगाण्णाचे, अमित व अनंत गाडेकर, उमेश व निलेश बाळेकुंद्री, अक्षया व भाग्यलक्ष्मी मालवणकर यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.