बुधवार दिनांक 22 ते 28 जुलै 2020.
गणेशोत्सव संदर्भात सरकारी नियम पाळणे अत्यावश्यक
मुंबई, पुण्यानंतर बेळगावतील गणेशोत्सव अत्यंत भव्य प्रमाणात साजरा होतो, हे सर्वांना माहीत आहेच. पुढील महिन्यात 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वषी कर्नाटक राज्यात कोठेही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही. जर कोणी हे नियम पाळत नसेल तर, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आलेला आहे, असे समजते. गणेशोत्सव मंडळांनी याची गांभीर्याने दखल घेऊन
सुज्ञपणा दाखवून आपल्या घरातच गणपती पूजन करावे. घरातील गणपती असो, अथवा बाहेरचा असो, कुठेही त्याचे दर्शन घेतलात तरी, त्याची कृपा होणारच
मुंबईच्या लालबागचा असो, अथवा तुमच्या घरातील गणपती असो, तो शेवटी एकच आहे. तो जागृत, हा निष्क्रिय असे काही नसते. गणपती हा शेवटी एकच असतो. तुमची श्रध्दा मात्र खरी असावी लागते, हे लक्षात ठेवावे. तुम्ही किती मोठय़ा प्रमाणात गणेशोत्सव साजरा करता याला महत्त्व नाही. सर्व सरकारी नियम पाळून गणेशोत्सव साजरा करणारच, असा हेका काहीजणांनी धरलेला आहे. तुम्ही कितीही नियम पाळतो म्हटला तरी, लोक ऐकत नाहीत. चुकून जर काही गोंधळ झाला, अथवा पोलिसांनी कारवाई केली तर, होणाऱया पुढील परिणामाची जबाबदारी कोण स्वीकारणार आहेत का? कोरोना सध्या तिसऱया टप्प्यात, म्हणजेच सांसर्गिक समूहात असल्याचे अनेक तज्ञ लोक सांगत आहेत. त्याचा संसर्ग जर पुन्हा झपाटय़ाने वाढला तर, याची जबाबदारी, वैद्यकीय खर्च वगैरे, कोण करणार? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यास देखील हाच काळ योग्य आहे. बेळगावात काही भागात दोन फर्लांग अंतरात चार-पाच सार्वजनिक गणपती बसविलेले आढळतात, हे योग्य आहे का? याचा विचार होणे ही काळाची गरज आहे. सोयरसुतक, आर्थिक अडचण, जागेची टंचाई, नोकरी व्यवसाय, शिवाशिव व तत्सम अनेक कारणाने गणपती आणावा की नको, असे अनेक प्रश्न उद्भवतात. अशावेळी कोण सांगते, याकडे लक्ष न देता आपली अडचण, तसेच प्राप्त परिस्थितीला अनुसरून आपल्याला जसे शक्मय होईल तसे करावे. गणेश चतुर्थीला गणपती आणणे जमले नाही तर, ते वर्ष सोडावे व पुढील वषी आणावा. पणं सोयरसुतक संपले, गणेशोत्सव सुरू आहे, तोपर्यंत केव्हाही गणपती आणून पूजा करु असे मात्र करू नका. चतुर्थीचे महत्त्व पंचमीला अथवा इतर तिथीला येत नाही. गणपती आणणे शक्मय नसेल तर, आजूबाजूच्या कोणत्याही गणेश मूर्तीला नमस्कार करा, अथवा पूजेचे साहित्य द्या, गणेशाची कृपा नक्कीच होईल. गणेश पूजन भक्तिभावाने करा. केवळ प्रथा आहे, म्हणून करणे याला काही अर्थ नाही.
मेष
या आठवडय़ात रवी-शनीचा होणारा प्रतियोग, नोकरी, व्यवसाय आणि राहत्या जागेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी घडविण्याची शक्मयता आहे. वादावादीचे प्रसंग टाळावेत. नोकरीत कितीही त्रास झाला तरी, ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक बाबतीत विशेष अडचणी येणार नाहीत. शुक्र उत्तम असल्याने मनातील अनेक इच्छा पूर्ण करू शकाल. व्यवहारिक बाबतीत काही गोष्टी मनासारख्या होतील. शारीरिक आजार कमी होतील, पण आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. अन्यथा किरकोळ बाबी देखील उग्रस्वरूप धारण करू शकतील. गुरुकृपेने आर्थिक बाबतीत चांगले यश मिळेल. मंगलकार्याच्या वाटाघाटी सुरू होतील. हाती घेतलेली अनेक कामे पूर्ण करू शकाल. गडबड, गोंधळ यांच्या मागे लागू नका, अन्यथा नवीन अडचणी निर्माण होतील.
वृषभ
रवि-शनी चा प्रतियोग प्रवासात अडचणी निर्माण करेल. आजूबाजूचे शेजारी अथवा नातेवाईक यांच्याशी जपून बोला. आर्थिक बाबतीत विशेष अडचणी येणार नाहीत, पण अचानक खर्च मात्र निर्माण होतील. राशी स्वामी शुक्र खुश असल्याने मनासारख्या अनेक गोष्टी सहज साध्य होतील. त्यामुळे मानसिक सामर्थ्य वाढेल. मंगळाचे भ्रमण काही बाबतीत चित्र निर्माण करील. कुणाचीही जबाबदारी स्वीकारू नका. अंगलट येऊ शकते.
मिथुन
धन आणि अष्टम स्थानातून होणाऱया रवि-शनिचा प्रतियोग, आर्थिक बाबतीत चांगला नाही. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. डोळय़ांची काळजी घ्या. रागाच्या भरात कुणालाही काहीही बोलू नका. कुणीतरी त्याचा गैरवापर करू शकतील. शुक्राच्या सहकार्याने गरजेच्या वेळी पैसा मिळत राहील.
कर्क
राशीतून होणारा रवि-शनीचा प्रतियोग, आरोग्य आणि वैवाहिक जीवनावर प्रभाव टाकेल. किरकोळ निमित्त होऊन काही आजार निर्माण होतील. वैवाहिक जीवनात कटूता येऊ देऊ नका. किरकोळ प्रसंग, नको त्या थरापर्यंत जाऊ शकतात.
सिंह
राशीस्वामी रविवर शनीची दृष्टी आहे. त्यामुळे काही बाबतीत जपुनच निर्णय घ्यावे लागतील. कोर्टमॅटर अथवा सरकारी कामाच्या बाबतीत अडथळे येण्याची शक्मयता आहे. सूर्याची आराधना चालू ठेवा. बऱयाच अडचणीतून मार्ग निघेल. वाहन शक्मयतो कोणालाही देऊ नका. इतरांच्या चुका तुम्हाला निस्तराव्या लागतील.
कन्या
लाभ आणि पंचमस्थानातून होणारा शनीचा प्रतियोग संततीच्या बाबतीत अडथळे निर्माण करील. काही मित्रमंडळींच्या चुकीमुळे, नको त्या प्रकरणात अडकाल. त्यामुळे प्रसंगावधान ठेवा. काही निर्णय स्वतःच्या मनाने घेणे योग्य ठरेल. गुरुची कृपा असल्याने व्यवसायिक बाबतीत अनुकूल घडामोडी.
तूळ
दशमचतुर्थ स्थानातून होणारा रवि-शनीचा प्रतियोग अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडविण्याची शक्मयता आहे. त्यातील काही लाभदायक तर, काही नुकसानकारक ठरू शकतील. त्यासाठी कोणतेही काम विचारपूर्वक आणि चारचौघांच्या सल्ल्याने करा. कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ योग्य ठेवा. म्हणजे पुढील काही योजनांसाठी त्याचा योग्य वापर करता येईल.
वृश्चिक
रवि-शनी प्रतियोग अनेक बाबतीत अडचणी निर्माण करील. पण मोठे यशही देईल. कर्तव्यनि÷ा, धाडस यांच्या जोरावर मोठे यश मिळवू शकाल. विवाहाच्या प्रयत्नात असाल, तर मनासारखे चांगले आणि सुसंस्कृत घराणे येऊ शकेल, पण काही बाबतीत संयम ठेवणे, आवश्यक. शुक्र सप्तमात असल्याने भागिदाराकडून मोठा फायदा होईल.
धनु
साडेसातीच्या काळात होणारा रवि-शनीचा प्रतियोग, काही नव्या समस्या निर्माण करेल. मन शांत ठेवून निर्णय घ्यावा लागेल. अनावश्यक खर्चाला फाटा द्या. काहीही संबंध नाही, अशांच्या अंतर्गत व्यवहारात लक्ष घालू नका. निष्कारण बदनाम व्हाल. जुने वाहन अथवा वस्तू विक्री करताना काही भाग तुटण्याची शक्मयता.
मकर
आपण करतो ते सर्व योग्य असे नसते, त्यामुळे काही बाबतीत अनेकांचा सल्ला घेऊनच निर्णय घेणे आवश्यक ठरते. साध्या कोरोनाचे संक्रमण सुरू आहे, त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. रवि-शनि प्रतियोग, कोणतेही काम सुरळीत पार पडू देणार नाही. त्यामुळे मन शांत ठेवूनच कामे करावी लागतील.
कुंभ
अनिष्ट स्थानातून होणारा रवि-शनिच्या प्रतियोगाने निष्कारण बदनामी, अथवा मानसिक त्रास, खर्चात वाढ, खोटे आरोप येणे असे प्रकार घडण्याची शक्मयता आहे. त्यासाठी अनावश्यक ठिकाणी जाणे टाळा, तसेच कुणालाही निष्कारण तुमच्या प्रकरणात हस्तक्षेप करू देऊ नका. आर्थिक बाबतीत ग्रहमान उत्तम आहे. जागा आणि वाहन याबाबत अपेक्षा पूर्ण होतील.
मीन
आपण ठरवलेले प्रत्येक काम होतेच असे नाही, व कटू असली तरी, काही गोष्टी कराव्या लागतात, याचा अनुभव या आठवडय़ात येईल. विशेषतः मुलांच्या कृत्याकडे लक्ष द्या. त्यांनी अनवधानाने केलेल्या काही चुका महागात पडू शकतील. आर्थिक बाबतीत मात्र हा सप्ताह अतिशय चांगला जाईल. पूर्वी जर कोठे गुंतवणूक केलेली असेल, तर ती परत मिळू शकते. कुलदेवतेची नवस वगैरे फेडण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे बऱयाच अडचणीतून मार्ग निघेल.