बुधवार दि. 19 मे ते मंगळवार दि.25 मे 2021
गोष्टी किरकोळ पण त्यांचा अर्थ गहन!
हाती पैसा टिकत नाही, कोणतेही काम वेळेवर होत नाही, सतत अपमानास्पद स्थिती, नोकरीत त्रास, जाईल तिथे अपमान, लोकांच्या आपल्या विषयी तिरस्कृत भावनां होणे, लोक आपल्याला तुच्छ समजतात, आपल्याला किंमत देत नाहीत, नोकरीत पगारवाढ होत नाही, लक्ष्मीची कृपा नाही, शिजविलेले अन्न सतत बिघडते, अशा तक्रारी सतत कुठे ना कुठे ऐकू येत असतात. यामागे बरीच कारणे असली तरी आपल्याकडून कळत-नकळत होणाऱया चुका हेच यामागील महत्त्वाचे कारण असते, असे आमच्या अभ्यासातून दिसून आलेले आहे. कुठेतरी सहज जाताना पहा, काही लोकांनी प्लास्टिकच्या टोप्या उलटय़ा घातलेल्या दिसून येतात. घरात श्रीमंती असूनही फाटक्मया जीन्स वापरत असतात. चप्पल, बूट घालून सरळ घरात शिरून स्वयंपाकघर अथवा बेडरूमपर्यंत जातात. जेवण झाल्यावर ताटातच हात धुतात. बक्कळ पैसा अथवा श्रीमंती असूनही देवपूजेला मात्र किडकी व बाद झालेली फुले वापरतात. तसेच एका पूजेसाठी वापरलेले साहित्य दुसऱया पूजेसाठी वापरतात. घरात, ऑफिसात कामाच्या ठिकाणी स्वच्छता नसते. कोठेही शिस्त पाहावयास मिळत नाही. रद्दी अथवा पुस्तके अस्ताव्यस्त कुठेही पडलेली दिसून येतात. वापरलेले कपडे अथवा धुतलेले कपडे अस्ताव्यस्तपणे पडलेले असतात. बाहेर फिरून आल्यावर तेच कपडे तिजोरीत ठेवले जातात. या गोष्टी क्षुल्लक वाटल्या तरी त्याचे परिणाम मात्र फार गंभीर असतात, हे कुणी लक्षात घेत नाहीत. एखाद्या चित्रपटातील एखादा नट उलटी टोपी घालतो म्हणून आपणही त्याचे अनुकरण करायचे, हॉटेल असो अथवा घर, चप्पल, बूट न काढता जेवायला बसतात, ही सारी लक्षणे अवदसेला व दारिद्रय़ाला निमंत्रण देणारी असतात. टोप्या अथवा कपडे उलट-सुलट घालणे. लक्तरे लोंबणाऱया फाटक्मया जीन्स वापरणे हे तर अतिशय दरिद्री लक्षण म्हणता येईल. कोणतेही धार्मिककार्य करताना अथवा पूजा वगैरे करताना कमरेखालील भाग अशुद्ध मानलेला असल्याने त्याला स्पर्श करू नये असे म्हणतात. पण पूजा करणारे अथवा सांगणारे लोकच मांडी खाजव, पाय खाजव, नको ते विचित्र आवाज काढणे असे प्रकार करताना दिसतात. घरातील पसारा आणि अस्वच्छ राहणे, याबद्दल तर न बोलणे चांगले. आपण जेवढे स्वच्छ टापटीप व व्यवस्थित राहू त्या प्रमाणात लक्ष्मीची कृपा चांगली होते. कोणती संकटे आली तरी त्यातून निश्चित सुटका होते. घर छोटे असो अथवा बंगला असो, ते जर नीटनेटके असेल तर लोकांची भावना आपल्या विषयी निश्चितच चांगली होते. पण सर्व काही असूनही गबाळे राहिल्यास लोक तुच्छ समजतात. गेली तीन-चार वर्षे सतत निरीक्षण केले असता या बाबी दिसून आलेल्या आहेत. त्यामुळे यापुढे तरी शहाणे व्हा आणि कसे वागावे ते ठरवा. देवाने तुम्हाला सर्वकाही दिले असूनही तुम्ही जर मुद्दामहून फाटके कपडे घालून असाल, टोप्या वगैरे उलटसुलट वापरत असाल तर तुमचे कोणतेही काम व्यवस्थित होणार नाही. तसेच त्या कामाची सुरुवात होणार नाही. त्यात असंख्य अडचणी येणार आहेत हे लक्षात ठेवावे. माणसाचे जन्मनक्षत्र आणि रास तसेच कुंडलीतील ग्रहस्थितीवरून संबंधित व्यक्ती शिस्तप्रिय आहे की बेशिस्त? त्याच्या प्राप्त परिस्थितीला जबाबदार कोण? या साऱया बाबी सहज समजू शकतात. वर्षभर शिस्तीने आणि संयमाने तसेच स्वच्छ राहून पहा, बराच चांगला अनुभव येईल.
मेष
महत्त्वाचे ग्रह सर्व बाबतीत अनुकूल आहेत. कोणतीही मोठी कामे करून घ्या. त्यातही जुनी रखडलेली कामे हातावेगळी करण्याचा प्रयत्न करा. लग्नाच्या वाटाघाटी अथवा मंगलकार्य यासाठी अनुकूल काळ आहे. नोकरी-व्यवसायात जर काही समस्या असतील तर त्या मिटतील. चंद्र-हर्षल युतीमुळे काहीवेळा अंतिम निर्णय घेणे कठीण होईल. अशावेळी घाई गडबड न करता चारचौघांचा सल्ला घेऊनच निर्णय घेणे योग्य ठरेल. आंतरजातीय प्रेमप्रकरण होण्याची शक्मयता. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होईल.
वृषभ
काहीवेळा ध्यानीमनी नसताना अचानक अडलेली कामे होऊन जातात. अपेक्षा नसताना कुठून तरी पैसा मिळतो. भगीरथ प्रयत्न करूनही व्यवसायातील अडचणी कमी होत नसतील तर त्या आपोआप दूर होतात. अशा काही घटना या महिन्यात घडतील. घर, जागा, वाहन तसेच स्थिरस्वरूपाची कोणतीही कामे करण्यास हरकत नाही. आर्थिक अडचणी पडणार नाहीत, पण खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे. वैद्यकीय उपचार घेताना चारचौघांचा सल्ला घेऊनच खर्च करा. विवाहाच्या वाटाघाटी जपून करणे योग्य ठरेल.
मिथुन
चंद्र-गुरु-नेपच्यूनचा त्रिकोणयोग अत्यंत शुभ आहे. अशा योगावर पुढील काही घटनांचा अंदाज लागतो. तसेच हाती घेतलेल्या कामात दैवी सहाय्य मिळू शकते. विवाहाच्या बाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक समस्या जाणवणार नाहीत, तरीही प्राप्त परिस्थितीचा प्रभाव देखील आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे काही बाबतीत काटकसर करणे आवश्यक समजावे. देवाधर्माकडे विशेष लक्ष द्या. कारण चार महत्त्वाचे ग्रह नको त्या ठिकाणी आहेत. ते काय गोंधळ घालतील सांगता येणार नाही. पण जर अनु÷ान चालू असेल तर कोणत्याही संकटातून आपोआप सुटका होईल.
कर्क
‘आंधळा मागतो एक देव देतो दोन डोळे’ अशी अनुकूल परिस्थिती आहे. योग्य दिशेने चाललेले प्रयत्न, कष्ट, चातुर्य आणि पुढील काळाचा अंदाज घेऊन कामे करीत असाल तर तुमच्या अपेक्षेपेक्षाही दुप्पट फायदा होऊ शकतो. शिक्षणातील अडचणी कमी होतील. काही कारणाने थंडावलेले व्यवहार पुन्हा सुरू होतील. वैवाहिक जीवनातील समस्या मिटतील. काही मित्रांच्या सहकार्याने एखाद्या नवीन क्षेत्रात प्रवेश करू शकाल. जर तुमच्याकडे चांगल्या कल्पना असतील तर नवा उद्योगदेखील सुरू होऊ शकतो.
सिंह
लाभातील मंगळ आणि दशमातील चार ग्रह हा अतिशय अतिशय चांगला राजयोगकारक शुभयोग आहे. कोणतेही काम अशक्मय वाटणार नाही. जे काम हाती घ्याल ते जिद्दीने पूर्ण करून दाखवाल. पैसा आहे म्हणून निष्कारण खर्च करू नका. कमवण्यापेक्षा राखून ठेवणे महत्त्वाचे हे लक्षात असू दे. काहीवेळा मानसन्मान जपण्यासाठी प्रमाणाबाहेर खर्च केला जातो, त्याला कुठे तरी आळा घाला. वास्तुसंदर्भातील कोणते ही काम करून घ्या. अडचणीच्या वेळी घरातील काही जुन्या वस्तूंचा चांगला उपयोग होईल.
कन्या
दशमातील मंगळ नोकरी व्यवसायात काहीतरी महत्त्वाची जबाबदारी टाकेल. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जाईल. भाग्यातील चार ग्रहांची युती मनातील अनेक सुप्त गोष्टीना मूर्त स्वरूप प्राप्त करून देईल. नोकरी, धंदे लॉकडाऊनमुळे बंद असले तरी कुठून तरी मदत मिळत राहील. त्यामुळे महत्त्वाची कामे अडणार नाहीत. दैवीकृपा मिळण्याचे योग दिसतात. त्यामुळे धार्मिकतेकडे विशेष लक्ष द्या. या महिन्यात देवाधर्मा संदर्भात केलेले कोणतेही काम चांगले फळ देऊन जाईल, पण तरीही तीर्थयात्रा-जत्रा-यात्रा, कुंभमेळा अशा ठिकाणी जाणे टाळा.
तूळ
भाग्यातील मंगळामुळे मनात नसताना काही गोष्टी कराव्या लागतील, पण अपयश मिळणार नाही. अष्टमस्थानात चार-चार महत्त्वाचे ग्रह ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळे कोणतेही काम वेळेवर अथवा मनासारखे होईलच या भ्रमात राहू नका. पण प्रयत्नही सोडू नका. गुरुचे पाठबळ चांगले असल्याने विवाह, नोकरी, मुलाबाळांची अपेक्षापूर्ती, शिक्षण, नावलौकिक, व्यावसायिक भाग्योदय यादृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. आरोग्याकडे मात्र जास्तीत जास्त लक्ष द्या. कारण अष्टमातील राहू अचानक काही रोग निर्माण करू शकतो. त्यासाठी सावध रहा.
वृश्चिक
राशीस्वामी अष्टमात असल्याने काही बाबतीत संयम बाळगावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुणाच्या भांडणात मध्यस्थी अथवा तडजोड वगैरे करू नका. आपण बरे आपले काम बरे ही वृत्ती ठेवा. म्हणजे मनःशांती लाभेल. सप्तम स्थानी चार ग्रहांची युती काही बाबतीत अतिशय शुभ तर काही अंशी अडचणी निर्माण करणारी आहे. त्यातही विवाहासंदर्भातील वाटाघाटी सुरू असतील तर जरा सावध राहणे चांगले. नोकरी-व्यवसायात अनेकांची जबाबदारी तुमच्यावर पडण्याची शक्मयता आहे पण त्या प्रमाणात पैसाही भरपूर मिळेल.
धनु
चार महत्त्वाचे ग्रह सहाव्या स्थानी हा योग नोकरी-व्यवसाय, आर्थिक भरभराट, अडलेल्या कामाला गती मिळणे, अडकलेली रक्कम वसूल होणे, तसेच परागंदा झालेली व्यक्ती परत येणे, चोरी वगैरे झाली असेल तर त्या वस्तूंचा शोध लागणे या दृष्टीने चांगले अनुभव येतील. पण तरीही गुप्तशत्रूंच्या कारवाया, कटकारस्थान, अपघात, आजार, चुकीच्या औषधाने जिवावरचे प्रसंग अशा काही अनिष्ट बाबी क डे चुकूनही दुर्लक्ष करू नका. काहीवेळा एखाद्या बारीक सूईनेदेखील मोठे सेप्मटीक होऊ शकते, हे लक्षात ठेवून त्या परिस्थितीशी सामना करण्याचा प्रयत्न करा. मनातील गोष्टी कोणालाही सांगू नका.
मकर
सहज म्हणून लावलेले झाड मोठे होते आणि त्याची असंख्य फळे आपल्याला देते, या न्यायाने जर तुमच्या हातून पूर्वी काहीतरी चांगले कर्म घडले असेल तर त्याचा फायदा या महिन्याभरात होऊ शकेल. मनासारखी नोकरी मिळणे, स्वतःची वास्तू होणे, भाडेकरूंना मनासारखे घर मिळणे, अत्यंत महागडे वैद्यकीय उपचार कमी खर्चात होणे, नवीन नातेसंबंध जोडले जाणे अशा काही शुभघटनांचा यात समावेश राहील. पण त्याचबरोबर नजरबाधा, घरातील पूर्वार्जित दोष, निष्कारण गैरसमज यांचीही शक्मयता आहे. त्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे.
कुंभ.
काहीवळा घाईगडबडीत आपण वाहन बाहेर काढतो, पण एखादा उंदीर अथवा मांजर व तत्सम प्राण्यामुळे अचानक समस्या निर्माण होऊ शकतात. तशा काही घटना या आठवडय़ात जाणवतील. पण कितीही अडचणी आल्या तरी महत्त्वाची कामे अडणार नाहीत. गुरुची कृपा असल्याने सर्व कामे होऊ लागतील. विवाहासाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात यश मिळेल. दीर्घकाळ संतती नसणाऱयांना अपेक्षित वृत्त समजेल. मानसिक समाधान व कौटुंबिक स्थिती चांगली राहील.
मीन
सुखस्थानी मंगळाचं वास्तव्य कुटुंबात किरकोळ धुसफूस निर्माण करेल, पण प्राप्त परिस्थिती गंभीर असल्याने कुठेही वादविवाद न करता तडजोड करा. वास्तू आणि वाहन संदर्भातील कोणतीही कामे अत्यंत जपून करा. पराक्रम स्थानातील चार ग्रहांची युती तुमच्या कार्यकर्तृत्वाला पोषक आहे. थोडीशी जिद्द आणि प्रयत्न चालू ठेवा, त्यामुळे न होणारे काम देखील होऊन जाईल. नोकरी-व्यवसायात वरि÷ांच मन सांभाळण्याचा प्रयत्न करा. कमाई आणि खर्च यांचे गणित बिघडणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक.