प्रतिनिधी /बेळगाव
भाग्यनगर 7 वा व 8 वा क्रॉस येथील भंगीबोळात कचऱयाची उचल केली जात नसल्याने घाणीचे प्रमाण वाढले होते. या समस्येवर ‘तरुण भारत’ने आवाज उठवताच महानगरपालिकेचे डोळे उघडले. रविवारी या कचऱयाची उचल करण्यात आली. यामुळे परिसरातील नागरिकांमधून ‘तरुण भारत’चे आभार मानण्यात येत आहेत.
शहरातील कचऱयाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कचरा गोळा करण्याचे काम करणाऱया स्वच्छता विभागाकडून वेळच्या वेळी उचल केली जात नसल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. भाग्यनगर येथील भंगीबोळात अशाच पद्धतीने कचरा साचून होता.
या कचऱयात वैद्यकीय कचऱयासह पीपीई कीटदेखील टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्वच्छता कर्मचाऱयांना सांगूनही कचऱयाची उचल केली जात नव्हती. अखेर या समस्येवर ‘तरुण भारत’मधून बातमी प्रसिद्ध होताच मनपा प्रशासन खडबडून जागे झाले. माजी महापौर किरण सायनाक यांच्या पुढाकाराने भंगीबोळातील कचऱयाची उचल करण्याची मोहीम राबविण्यात आले.