प्रतिनिधी /बेळगाव
परिसरातील कचरा आणून भाग्यनगर दुसरा क्रॉस येथे साठविला जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. कचऱयामुळे भटक्मया कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले असून, या ठिकाणी कचरा टाकणे बंद करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
दुसरा क्रॉस येथील खुल्या जागेसमोर स्वच्छता कर्मचाऱयांकडून कचरा साठविला जात आहे. यापूर्वी लहान वाहनांमधून कचरा आणून तो मोठय़ा वाहनांमध्ये भरला जात होता. परंतु आता हा कचरा त्या ठिकाणी टाकून वेळ मिळेल त्या प्रमाणे त्याची उचल केली जात आहे. रहिवासी वस्तीच्या शेजारीच कचरा साठवत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात अनेक रुग्णालये, व्यावसायिक आस्थापने, हॉटेल असल्याने या सर्वांनाच या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कचऱयामुळे डास व भटक्मया कुत्र्यांचा वावर देखील वाढला आहे.
कचरा उचल न झाल्यास आंदोलन
मागील चार ते पाच दिवसांपासून या ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. शहराच्या मुख्य भागात अशाप्रकारे कचऱयाचा साठा करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत. यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून कचऱयाची उचल न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. तसेच यापुढे या ठिकाणी कचरा टाकू नये, टाकल्यास मनपाला नागरिकांचा विरोध सहन करावा लागेल, असा संताप रहिवाशांनी व्यक्त केला.