प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा येथील गोसपीर सय्यद बेनकीपूर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 80 भाजपा कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी रीतसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपा फक्त आपल्या कामापुरतीच कार्यकर्त्यांचा वापर करतात व नंतर फेकून देतात असा आरोप यावेळी गोसपीर यांनी केला. आपण गेली 15 वर्षे भाजपात आहे गटाध्यक्ष म्हणूनही काम केले मात्र आपल्यास त्यांनी हिन वागणूक दिली असल्याचे ते म्हणाले.
नगरसेवकांनी सर्वांशी मिळून मिसळून राहणे गरेजचे आहे मात्र भाजपमध्ये ते होत नव्हते. भाजपनी आमचा वापर फक्त आपल्या वैयक्तिक कामासाठीच केला. सरचिटणीस संजय बर्डे हे आपले परममित्र असून ते प्रत्येक कामात आमच्याबरोबर अग्रेसर असतात आणि कुठल्याही कामात रात्री अपरात्री धावून येतात त्यामुळे आम्ही आता आमच्या भवितव्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे असे ते म्हणाले. पुढे जाऊन आपण निवडणूक लढविण्याची तयारीही त्यांनी केली आहे.
यावेळी सरचिटणीस संजय बर्डे म्हणाले की, पोलिसांनी सर्वांना सहकार्य करावे, मुख्यमंत्री फोन केला तरी फोन उचलत नाही, राष्ट्रवादी पक्ष सक्रीय असून जे काही वाईट होईल त्यांच्या विरुद्ध आम्ही सदैव उभे राहणार असल्याचे ते म्हणाले. उपाध्यक्ष ऍड. अविनाश भोसले म्हणाले की, भाजपच्या कार्याला जनता कंटाळली आहे. आज अनेक गुन्हे वाढत आहे. भाजपच्या कालावधीत सर्वकाही भुलभुलय्या झाले आहे. भाजप देशाचे राजकारण करतात. आज ज्यांना नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळत नही. काँग्रेस पक्षाचे 12 आमदार भाजपात गेले मात्र अद्याप भाजपात गेल्यानंतर काहीच विकास झाला नाही असा आरोप त्यांनी केला. गोसपीर सय्यद यांच्या एनसीपी प्रवेशामुळे म्हापशात हा पक्ष बळकट झाल्याचे ते म्हणाले. शेतकरी सुरेश कोरगावकर यांनी आम्हा वयोवृद्धांना 2 हजार मिळत होते ते गेल्या सहा महिन्यापासून मिळत नसल्याने ते सरकारने मिळवून द्यावे अशी मागणी केली.