मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मोर्चा नेऊ ; काँग्रेसची मागणी व इशारा
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील भाजप सरकार भ्रष्ट आहे याचे प्रमाणपत्र गोव्याचे माजी राजपाल सत्यपाल मलीक यांनी दिले आहे. इतके दिवस विरोधी पक्ष सरकार भ्रष्टाचारी असल्याचे सांगत होते. काँग्रेसने अनेकवेळा राज्यपालांना या संदर्भात निवेदनेही दिले होती. आता खरोखरच सिध्द झाले की कोरोना काळातही भाजप सरकारने लोकांना लुटले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी संकल्प आमोणकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमाला जातील तिथे काँग्रेस कार्यकर्ते मोर्चा नेतील असा इशाराही आमोणकर यांनी दिला आहे.
साखळी मतदार संघ काँग्रेस गट समिती व प्रदेश काँग्रेस समिती यांनी येथील आझाद मैदानावर भाजप सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. त्यावेळी संकल्प आमोणकर पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या सोबत साखळीचे धर्मेश संग्लानी खेमलो सावंत, विजय भिके, वरद म्हार्देळकर, तसेच कँग्रेस सुमारे 50 कार्यकर्ते उपस्थित होते. कँग्रेस कार्यकत्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरकारवर खरपूस टीकाही केली.
राज्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भ्रष्टचाराची कथा केवळ गोव्या पूरती मर्यादीत राहिलेली नसून आता ती देश विदेशात पसरलेली आहे. डॉ, प्रमोद सावंत यांनी गोव्याची इज्जत इब्रत वेशीवर टांगली आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला मुख्यमंत्री पदावर रहाण्याचा अधिकार नाही. असेही संकल्प आमोणकर यांनी सांगितले.
साखळीचे आमदार आणि गोव्याचे मख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीच्या नावाची घाण केली आहे असे धर्मेश संग्लानी यांनी सांगितले. साखळीतील पर्ये मतदार संघातील प्रतापसिंग राणे यांनी तब्बल 16 वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळे 50 वर्षे आमदार राहिले त्यांनी साखळीवासीयांना एक मान मिळवून दिला होता. डॉ. सावंत यांनी तो मान मातीत मिळविल्याचे टीका संग्लानी यांनी केली आहे. डॉ. सावंत हे भ्रष्टाचारी हे सर्वांना माहित होते मात्र त्याचा पुरावा खुद्द भाजपचेच गोव्याचे माजी राज्यपाल देतील याची कुणाला कल्पनाही नव्हती. माजी राज्यपाल ठामपणे मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचारा विषयी नीवेदन कराता याचाच अर्थ भाजप सरकारचा भ्रष्टाचार कोणत्या थराला पोचला आहे त्याची आता गोमंतकीय कल्पना करू शकतात. भाजप सरकारला आता घरी पाठविण्याची वेळ आली असून जनतेने याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही संग्लानी म्हणाले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाषणे केली प्रत्येक वक्त्याने भाजप सरकारवर टीका करीत राज्यातील भाजप सराकर बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आल्तीनो येथील मुख्यमंत्र्याच्या शासकीय बंगल्यावर जाण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला असता त्यांना आझाद मैदानाच्या मुख्य गेटवर अडविण्यात आले. काँग्रेस कार्यकर्ते व पोलीस याच्यांत ढकलाढकल सुरु झाली. पोलासंना चक्रावून काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुसऱया गेटद्वारे आझाद मैदावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रस्त्यावरच अडविण्यात आले. काँग्रेस कार्यकत्यांनी रस्त्यावरच बसण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ताब्यात घेऊन पर्वरी पोलीस स्थानकावर नेण्यात आले.